Saturday, October 31, 2009

भगवंताची प्राप्‍ती होण्यासाठी मृत्यूसमयी करावयाचे उपाय!


`सत्यस्वरूप केवळ एकमेव परमेश्‍वर असतांना `परमेश्‍वराविना अन्य पदार्थच या सृष्टीत नाही', असे शास्त्रसिद्धांत युक्‍ती आणि ब्रह्मनिष्ठांचा अनुभव यांनी सिद्ध असतांना आम्हा जिवांना ही संपूर्ण सृष्टी, हे विषयजात सत्य अनुभवाला येते, याचे कारण काय ?

सम्राटाचा राज्याभिषेक असतो; म्हणून मांडलीक राजे नटून थटून रथातून निघतात. एका मांडलीक राजाचे दिवाळे निघाले होते; पण तोदेखील उत्तम पोषाख आणि कृत्रिम सुवर्णाचे, मोत्यांचे, हिर्‍यांचे अलंकार घालून रथातून निघतो. लोक म्हणतात, ``हे राजवैभव, बहुमूल्य असे हे सुवर्णाचे, मोत्यांचे अलंकार पहा ! राजाला कसे शोभून दिसतात. गळयातला कंठा मोत्यांचा असावा ! कसा सूर्यासारखा चमकतो आहे.'' एकेका मोत्याची किंमत लाख रुपये असावी. वास्तविक ते अलंकार खोटे, कृत्रिम आणि रोल्डगोल्ड आहेत; परंतु ते राजाच्या गळयात असल्याने खरे वाटतात. राजा आणि राजतेज सत्य आहे; म्हणून राजाच्या गळयातील खोटा, कृत्रिम कंठा खरा दिसतो !
जसे अधिष्ठान असेल, तशी वस्तू दिसते ! जग खोटे आणि कल्पित आहे, ते खरे का दिसते, तर सत्यस्वरूप परमेश्‍वराने हा मिथ्या जगाचा अलंकार गळयात घातला आहे. सत्य आहे; म्हणून सृष्टीची प्रतीती येते. याचा अर्थ तो पदार्थ सदैव मिथ्या असतो; पण अधिष्ठान सत्यतेमुळे सत्यवत प्रतीतीला येते; म्हणून हे जग खरे भासते.
हे जग भासमान आहे. ईश्‍वराच्या अधिष्ठान-सत्यतेमुळे ते खरे भासते. याचा अर्थ सृष्टी मिथ्या आहे. तिला स्वतंत्र सत्ता नाही; म्हणून ती नित्य मिथ्याच आहे. परमेश्‍वरामुळे हे जग सत्य भासते. भास हा नेहमी खोटाच आहे, भ्रमच भ्रम आहे; परंतु हा जो भ्रम आहे, तो ज्या अधिष्ठानावर पदार्थ भासतो, तो भासमान पदार्थ अधिष्ठानास झाकतो. हे भासमान जग त्या सत्य परमात्म्याला, जो जगाचे अधिष्ठान आहे आणि ज्याच्यामुळे जग प्रतीतीला येते, त्याला झाकून टाकते. हीच परमात्म्याची माया आहे.
वास्तविक मेघ हे सूर्यापासून उत्पन्न होतात; पण आकाशातले मेघ सूर्याला झाकतात। तेच सूर्याला झाकतात हे खरे; परंतु दिवसाचे दिवसत्व काही त्यामुळे नष्ट होत नाही। तसेच भगवंतच सर्वत्र सत्-चित्-आनंद रूपाने आहेच; परंतु आवरणामुळे त्याची प्रतीती न येता जगताची प्रतीती येते। यालाच `माया' म्हणतात।'


प्रयाणकाले मनसाऽचलेन भक्‍त्या युक्‍तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ।।

श्रीमद्‌भगवद्‍गीता, अध्याय ८, श्लोक १०

अर्थ : जो मनुष्य अंत:काळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योगसामर्थ्याद्वारे अविचलित मनाने, पूर्ण भक्‍तीभावाने भगवंताचे स्मरण करण्यात युक्‍त होतो, त्याला निश्चितच भगवंताची प्राप्‍ती होते.


मन सतत भरकटत असते, ते विखुरते. विखुरणारे मन गोळा करायचे, हृदयात आणायचे आणि हृदय-कमळात लावायचे. सुषुम्ना नाडी हृदयातून वर जाते. त्यातून हृदयातले प्राण वर खेचून घ्यायचे. मन हृदयातून, अनाहतचक्रातून वर वर न्यायचे. तसे प्राणही वर वर जातात. विशुद्धचक्र कंठात आहे. तिथपर्यंत प्राण न्यायचे. नंतर मन आणखी वर न्यायचे. ते भ्रूमध्यातील आज्ञाचक्रात येते. दोन दलांचे हे कमळ आहे. इथे प्राण येतात. नंतर सावध राहून मन आणखी वर मस्तकात न्यायचे. प्राण मनाबरोबर वर येतात. मस्तकातल्या सहस्रदल कमलात येतात. हे सहस्र पाकळयांचे कमळ मिटलेले असते. प्राणवायूच्या धक्क्याने, कुंडलीनीतल्या धक्क्याने त्या पाकळया उलगडतात. कमळ उमलते, उलगडते, मस्तकात येते. मस्तकाच्या टाळूत ब्रह्मरंध्र आहे. प्राण वर ब्रह्मरंध्रात आणायचे. ब्रह्मरंध्रातून प्राण आरपार जातात. टाळू फुटतो. त्यातून प्राण निघून जातात. शरिरातील धनंजय वायू टाळूतून बाहेर पडतो. अशा योगी पुरुषाला भगवंताची प्राप्‍ती होते.

संन्याशी मरतो, तेव्हा त्याची टाळू फुटून प्राण गेले नसतील, तर संन्याशाच्या शवाच्या टाळूवर नारळ फोडतात. टाळू फुटला की, शरिरातला धनंजय वायू निघून जातो. मग संन्याशाचे शव नदीला समर्पण करतात अथवा भूमीत पुरून ठेवतात.'

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००९)

Saturday, October 24, 2009

कुंकुमतिलक!


  • कुंकुम तिलक हे सौभाग्य भूषण तर आहेच शिवाय सौंदर्यभूषणही.
  • स्त्री आणि पुरूष अशा दोघांचेही कुंकुमतिलक हे सौभाग्य लेणं आहे. भ्रूमध्यात पुरूष कुंकुमतिलक लावतात. शक्ती उपासक देवीला कुंकुम समर्पण करून शेष प्रसाद म्हणून भ्रूमध्यात ललाटी धारण करतात. तशी आमची लक्षावधी वर्षाची परंपरा आहे. अक्षुण्ण अखंडीत परंपरा आहे.
  • ’रघुवंश’ महाकवि कालिदासाचे महाकाव्य! त्या काळातल्या सुदर्शन या परमदेखण्या पराक्रमी राजाचं वर्णन करताना कालिदास मोहोरतो.
  • ’सुवर्णाच्या पट्टयामुळे, परमविलोभनीय, परम सुंदर झालेल्या सुंदर कपाळावर या राजाने कुंकुम तिलक लावला आहे. त्या कुंकुम तिलकाने शत्रूस्त्रियांची मुखे शून्य झाली आहेत. (म्हणजे तिलकरहित बनवलेली आहेत. त्या विधवा झाल्या आहेत.)
  • प्राचीन संस्कृत कवींच्या काव्यात सुवासिनी नारींच्या कुंकुमतिलकाचा निर्देश पानोपानी आढळतो. कन्या ही सुमंगल वस्तु आहे. तिच्या ठायी लक्ष्मी वास करते.
  • नित्यं निवासतै लक्ष्मी: कन्याकासु प्रतिष्ठीत:। (महा तंत्र)
ती तर कुलाचं - भारतीय जीवनाचं ह्रदय आहे. (कन्येयम् कुल जीवित कुमार संभव.)
  • विवाह मंत्र आहे. ’सुमंगलीरियं वधु’ स्त्री ही स्वभावत:च निसर्गत:च पवित्र आहे। जसा अग्नी तशी स्त्री पवित्र आहे.
  • ''शयनात उत्थिता नारी: अशुचि: पुमान् शुचि: स्यात् " अशी स्मृति आहे. इथे स्त्री पावित्र्याचा कळस आहे. अंजन आणि अभ्यञ्चन म्हणजे काजळ, कुंकु, कुंकुमतिलक हे सौंदर्य तर आहेच शिवाय सौभाग्यही.
  • केशर, कस्तुरी, गोरोचन, चंदन अशा मंगलद्रव्यांचा समावेश कुंकुमात आहे.
  • कुंकुमतिलक हा अलक्ष्मीनाशक आहे. पूजाविधीत आवश्यक आहे. कुंकुम कांति देणारे आहे. कामवर्धक आहे आणि सौंदर्यवर्धकही. अंगाची दुर्गंधी दूर करणारे, शीतोपचार असणारे आहे. रोगनाशक आहे.
  • कुंकुमतिलक देवदेवतांना आकर्षून घेतो. कुंकुमतिलक भक्ती,भगवत प्रेम आदि भावभावनांना उधाण आणतो. तो भूत, प्रेत, पिशाच्च वगैरेंना दूर सारतो. विघ्नोत्सारण करतो. शुभाचं आकर्षण आणि अशुभाचं उत्सारण असे द्विविध कार्य करतो. स्त्रीपुरुषांनाही आकर्षित करतो.
  • सगळ्या सौभाग्य भूषणांत कुंकुमाला अग्रस्थान आहे. सौभाग्य हे पवित्र, मंगल म्हणून सौभग्याची भूषणही मंगल. पण सौंदर्य हे मंगल असतंच असं नाही. सौंदर्य म्हणजे काही सौभाग्य नव्हे. तो काही सौभग्याचा आधार नाही, वा गाभा नाही. सौभाग्याची लेणी ही शुभ असतातच. तसे असलेच पाहिजे. परंतु सौंदर्य वर्धनाकरता वापरलेली वस्तू सौभाग्यवर्धक आणि शुभ असेलच असं नाही. सौभाग्याकरता असलेल्या वस्तू शुभच असायला हव्या. सौंदर्यवर्धनाकरता वापरात येणार्‍या वस्तूंच्या बाबतीत तसा नियम नाही. सौंदर्यवर्धनाकरता वापारात असलेल्या साबण, पोमेडे, पावडर, लोशन, आदि वस्तु या शुभ वा सौभाग्यवर्धक नाहीत. सौंदर्यप्रसाधनाकरता वापरण्यात येणार्‍या वस्तूत चमक, मोहकता वगैरेचा वापर होतो. ते काही सौभाग्यभूषण नव्हे!
  • भारतीयांच्या विवाह संस्कारात सौभाग्य आणि सौंदर्य यात तीळमात्र अंतर नाही. सौभाग्य तेच सौंदर्य. सौभाग्याविना सौंदर्यच नाही.
  • विवाहविधीत सौभाग्यमस्मै दत्या अशी देवांची प्रार्थना आहे. वर अभिवचन देतो, "गृहामि ते सौभाग्‍त्वाय हस्त ।".
  • कुंकुमाचा रंग लाल. रजोगुणही लाल वर्णाचा. अनुराग आसक्ती हे रजोगुणाचे लक्षण. लालवर्णात आसक्ती आहे. तृष्णा आहे. स्नेह आहे. आकर्षण आहे. इथे पती पत्‍नीची मधूर, मनॊहर ओढ ते लाल कुंकू व्यक्त करते. त्यातूनच पुढे संयम निपजतो. त्याग येतो. हौतात्म्याची शक्ती लाभते. केवळ याच जन्मात नव्हे तर जन्मच-जन्म पती पत्‍नीचा सहयोग सहजीवन असावे. परस्परांची ह्र्दये, अंतरात्मे परस्परांत मिळून जीवन जगण्याची विलक्षण ओढ वृध्दिंगत व्हावी, ती असीत तृष्णा सतत चढती वाढती असावी, याचच दिग्दर्शन तो तांबडा कुंकुम तिलक करतो.
  • कुंकुम, वैभवाचं चिन्ह आहे, तसंच विरागतेचहि. तिथे भोग तर आहेच, शिवाय त्यागही.
  • कुंकुमतिलक या सौभाग्यलेण्याचं हे सामर्थ्य आहे, हे रहस्य आहे। त्याचा त्याग करून स्वत:ला पुरोगामी मुक्त sophisticated म्हणविणार्‍या कामिनीला काय म्हणावे?
*************************************************************************************
भगवंत शोधून न सापडण्याचे कारण...!

आकाशात, पाण्यांत मी आपणाला खूप शोधलं; पण.....

काही केल्या मी आढळलो नाही, असेच ना ?


``हं''


``नाहीच सापडायचा.


``कारण ?''


``मी आकाशच झालो होतो आणि पाण्यात पाणी ?'

(प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका: घनगर्जित, डिसेंबर २००७)

Sunday, October 18, 2009

श्रीमहाविष्णूचा पाचवा वामन अवतार!

`विष्णूने अनन्य भक्‍त असुराधिपती बलीवर अन्याय केला. असा कसा तो परमात्मा विष्णु ? त्याला करुणामय कसे म्हणावे ? बलीने अश्‍वमेध यज्ञ केला. त्या यज्ञात सर्व भुवन तृप्‍त झाले. देव व ऋषी यांनी त्या यज्ञाची विलक्षण प्रशंसा केली; पण बली हा भोगार्थी नाही, तर मोक्षार्थी आहे, असा निर्णय करून त्याचे इष्ट करण्याकरिता सिद्धी देणारा विष्णु (बटुवामन) त्याच्या यज्ञात आला आणि केवळ भोगाकरिता दीन झालेल्या व त्यामुळे अथवा असे करण्यास योग्य असलेल्या वडील बंधू इंद्राला जगताचा तुकडा देण्याच्या उद्देशाने, बलीला बाह्यदृष्ट्या फसवून; पण अंतरदृष्ट्या त्याचे कोटीकल्याण करून, त्या पापहारक हरीने, मायाबलाने तीन पावलांनी तिन्ही भुवने त्याच्यापासून हिरावून घेतली व त्याला पाताळातले राज्य दिले; पण बलीचे प्रारब्ध त्याला इंद्रत्व देणार आहे. तो त्याकरिता शरीर धारण करून जीवन्मुक्‍त स्थितीत आहे.'

।। मंगलाचरण ।।
`आपले कल्याण असो !'
`आपले स्वागत आहे !!'
`मी याचक आहे।'
`प्रभू ! मी आपली काय सेवा करू ?'
`मला जमीन हवी !'
`किती ?'
`माझ्या पावलाने, ...तीन पावले !'
`दिली !!'`
संकल्प जल हातावर द्या !'
शुक्राचार्य सांगतात, `बलीराजा देऊ नको !...याचक भिक्षुक नाही, साक्षात् `विष्णु' आहे।'
बली म्हणाले, `साक्षात विष्णूपेक्षा श्रेष्ठ असा दान देण्याला पात्र कोण असू शकतो ?

अशा प्रकारे राजा बलीच्या यज्ञारंभी पूजीत झालेला वामन भगवंत आम्हा सर्वांचे नेहमी रक्षण करो !!

धर्मद्रोह्यांनो, भगवंताची `सर्वांठायी कृपादृष्टी' लक्षात घ्या !
भगवंताने वामनरूप घेऊन दानवेंद्र बलीला बांधले, ही घटनाच करुणामय आहे. ज्याने आपले सर्वस्व समर्पित केले, अशा बलीशी भगवंताचा हा व्यवहार फार कठोर वाटतो; परंतु विचार केला तर, या भगवद्लीलेच्या मुळाशी असलेल्या त्या करुणामय प्रभूच्या अनंत कृपेची छाया स्पष्ट दिसेल. बलीवर अनुग्रह करण्याकरता भगवंताने सांगितले, `दैत्यराज, आम्ही हे सगळे केवळ तुझा गर्व हरण करण्याकरता केले. तू आपल्या अनंत पुण्यकर्माने सिद्ध झाला आहेस. आता तुला स्वर्गापेक्षाही उत्तम व श्रेष्ठ अशा पाताळातल्या सुतल लोकांचा राजा व्हायचे आहे. हा इंद्र निवृत्त होताच तुला स्वर्गाचे इंद्रपद प्राप्‍त होईल. त्यानंतर तुला माझे सायुज्य प्राप्‍त होईल. नंतर भगवान विष्णूने ऋषी-मुनी व विप्रांद्वारे बलीराजाचा तो महायज्ञ पूर्ण केला.
(श्रीमहाविष्णूचा पाचवा वामन अवतार, पृ. १३-१४. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी)

कोणत्याही कारणासाठी अहं नको !
आत्मा: तुम्ही कोण ?

मन: आम्ही प्रवासी आहोत.
आत्मा: प्रवासी तर दोघेच आहेत. एक सूर्य आणि दुसरा चंद्र. त्यांचा प्रवास कधी संपलाय का ?

मन: आम्ही अतिथी आहोत.
आत्मा: अतिथी तर दोघेच आहेत. एक पैसा आणि दुसरे तारुण्य! ते दोघेही आपल्याकडे पाहुण्यासारखेच येतात.
मन: आम्ही बुद्धीमान आहोत.
आत्मा: बुद्धीमानही दोघेच आहेत. एक गणपति आणि दुसरा मारुति.

मन: आम्ही शक्‍तीमान आहोत.
आत्मा: शक्‍तीमानसुद्धा दोघेच आहेत. एक शंकर आणि दुसरा हनुमान.
मन: आम्ही दानशूर आहोत.
आत्मा : एक कर्ण आणि दुसरा बळी राजा, हे दानशूर दोघेच आहेत

मन: आम्ही राजे आहोत.
आत्मा: ते तर दोघेच आहेत. इंद्र आणि दुसरा यम!

मन: आम्ही शूरवीर आहोत.
आत्मा: तेही दोघेच आहेत, एक श्रीराम आणि दुसरा अर्जुन!

मन: आम्ही खूप श्रीमंत आहोत.
आत्मा: एक लक्ष्मी आणि दुसरा कुबेर, हे दोघेच श्रीमंत आहेत.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, फेब्रुवारी, २००८)

Saturday, October 10, 2009

मंदिरात देवदर्शनाला जातांना..!


  • मंदिरे हे देवाचे घर आहे. मंदिरात पवित्र मनाने व देहाने जायचे आहे. स्नान करुन स्वच्छ साधा पोशाख घालून जा. पारंपरिक वेशभूषा घालून जा. पारंपरिक वेशभूषा सर्वोत्तम ! पुरूषांनी साधा कुडता आणि धोतर नेसून जावे. स्त्रियांनी साडी (शक्यतो नऊवारी साडी) नेसून जावे. मुले व मुलींनी साधा पारंपरिक पोषाख करावा. मंदिरात जमीनीवर बसायचे आहे, तसा अनुकुल पोशाख असावा.
  • मंदिरात जाण्याआधी त्या देव वा देवतेसंबधी चिंतन करा.
  • नरसिंहाच मंदिर असेल तर हिरण्यकश्‍यपूचा नरसिंहाने केलेला वध. प्रल्हाद , त्याची नरसिंहाची स्तुती, वगैरे मनात आणा. नरसिंह भगवान कृपाळू असून पूजन - अर्चन करणार्‍याची संकटे दूर करतात ते ध्यानी आणा.
  • देवदर्शनाला कधीही रिक्त हाताने जाऊ नये. काही फुले, फळे, हार, वगैरे घ्या. विष्णुमंदिर असेल तर तुळशी घ्या. शंकराचे मंदिर असेल तर बिल्वदले घ्या. गणपतीचे मंदिर असेल तर दुर्वा, शमीपत्रे घ्या.
  • मंदिरात प्रसन्न पवित्र मनाने प्रवेश करा. उंबरठा ओलांडतांना वाकून नमस्कार करा. फुले, फळे वगैरे देवाला समर्पण करा. साष्टांग नमस्कार घाला. परमेश्‍वराचे सान्निध्य अनुभवा.
  • देवाला साष्टांग नमस्कार करणे हे आमचे पारंपरिक ईश्‍वर शरणागतीचे प्रतिक आहे. ती देवपूजा आहे. तिथे आत्मनिवेदन आहे. साष्टांग नमस्कार म्हणजे....
    • आष्टांग - हात (२) , छाती (१) , कपाळ (१) , गुडघे (२) , पाय (२) जमीनीला स्पर्श करतात.
    • स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालायचा नाही. अष्टांगे नव्हेत तर स्त्रियांची पंचागे जमीनीला स्पर्श करतील. गुडघ्यावर वाकून जमीनीला डोके लावून स्त्रियांनी प्रणाम करायचा. हात (२) , डोके (१) , पाय (२) जमीनीला स्पर्श करतात तो पंचांग प्रणाम!
  • भक्तांची मंदिरातील देवपूजा विविध प्रकारची असू शकते. भक्त मंदिरात एका कोपर्‍यात बसून देवमूर्तिकडे डोळे भरून पाहत, अर्थाचे अनुसंधान राखून स्तोत्र म्हणतो, मंत्र म्हणतो. ध्यान करतो. पूजेनंतर स्तोत्र पठण, मंत्रपठन, ध्यान, जप करायचे आहे.
  • प्रभू कृपाळू आहेत. श्रध्देने केलेली तुमची पूजा प्रभू स्वीकारतात.
  • भगवंताचे पूजन अर्चन चिंतन नमस्कार ध्यान स्तोत्रपठन वगैरे कर्म हे कधीही निष्फळ होत नाही. भगवंताचे दर्शन कधीही व्यर्थ जात नाही.

हिंदु संस्कृती
  • वेद(४) - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.
  • राशी(१२) - मेष,वृषभ,मिथुन,कर्क,सिंह,कन्या,तुला,वृश्‍चिक, धनु, मकर,कुंभ,मीन.
  • ऋतु(६) व मास (१२) - वसंत (चैत्र-वैशाख), ग्रीष्म (जेष्ठ-अषढ) , वर्षा (श्रावण-भाद्रपद), शरद (अश्‍वीन-कार्तिक), हेमंत (मार्गशीर्ष-पौष), शिशिर (माघ-फाल्गुन).
  • दिशा (१०) - पूर्व, पश्‍चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय वायव्य, नैऋत्य, आकाश, पाताळ.
  • संस्कार (१६) - गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोत्रयन, जातकर्म, नामकरण, निषक्रमण, अन्नप्राशन, चूडाकर्म, कर्णभेद, यज्ञोपवीत, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह, आवसथ्यधान, श्रौतधान.
  • सप्तअऋषि (७) - विश्‍वामित्र, जमदग्नि, भारद्वाज. गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्‍यप.
  • सप्तपर्वत - हिमालय (उत्तर भारत) , मलय (कर्नाटक व तामिळनाडू) , सह्याद्री (महाराष्ट्र) , महेन्द्र (उडिसा), विंध्याचल (मध्यप्रदेश), अरवली (राजस्थान), रैवतक (गिरनार-गुजरात)
  • ज्योतिर्लिंग (१२) - सोमनाथ नागेश (गुजराथ), मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश), रामेश्‍वर (तामिळनाडू), महाकालेश्‍वर, (उज्जैन), ॐकारेश्‍वर (मध्यप्रदेश) , केदारनाथ (उत्तरांचल), विश्‍वनाथ (उत्तर प्रदेश), परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्‍वर , घृष्णेश्‍वर , भीमाशंकर (महाराष्ट्र).
  • पीठ(४) - शारदापीठ (द्वारका - गुजरात) , ज्योतिष्पीठ (जोशीमठ - उत्तरांचल), गोवर्धनपीठ (जगन्नाथपुरी - उडीसा), शृंगेरीपीठ (शृंगेरी-कर्नाटक)
  • चारधाम - बद्रिनाथ (उत्तरांचल), रामेश्‍वरम (तामिळनाडू), द्वारिका (गुजरात), जगन्नाथपुरी (उडीसा).
  • सप्तपुरिया - अयोध्या, मथुरा, काशी (उत्तर प्रदेश), हरिद्वार (उत्तरांचल), कांचीपुरम (तामिळ्नाडू) , अवन्तिका (उज्जैन - म.प्र.), द्वरिक (गुजराथ).
  • चारकुंभ - हरिद्वार (उत्तरखंड), प्रयाग (उत्तर प्रदेश), उज्जैन (मध्य प्रदेश) ,नाशिक (महाराष्ट्र)
  • प्रात:स्मरणीय नद्या - गंगा , कवेरी, यमुना, सरस्वती, नर्मदा, महानदी, गोदावरी, कृष्णा , ब्रम्हपुत्रा.
  • लक्ष्मी(८) - आद्यलक्ष्मी , विद्यालक्ष्मी , सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी, भोगलक्ष्मी,योगलक्ष्मी.
  • युग(४) - सत्ययुग, त्रेतायुग,द्वापारयुग, कलियुग.
  • पुरूषार्थ(४) - धर्म , अर्थ , काम , मोक्ष.
  • प्राकृत गुण (३) - सत्व , रज ,तम.
  • नक्षत्र (२८) - अश्‍विनी,भरणी, कृतिका ,रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्‍लेषा, मेघा , पूर्वाफाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती , विशाखा , अनुराधा , ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रावण, घनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती, अभिजित.
  • दशावतार - विष्णू, मत्स्य, कूर्म , वराह , नरसिंह , वामन, परशुराम, राम, कृष्ण, कलकी.
  • शीख धर्मगुरू(१०)- नानकदेव , अंगददेव , अमरदास, रामदास , अर्जुनदे , हरकिशन, हरराय, हरगोविंद, तेगपहाद्दूर, गोविंदसिंह.
-प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साप्ताहिक सनातन चिंतन)

Sunday, October 4, 2009

सनातन धर्माचे पुनरुत्थान व्हावे, यासाठी आपल्याला प्रयत्‍नांची शिकस्त करायची आहे !

हिंदु धर्माची वैशिष्ट्ये

१. `सनातन हिंदुधर्म संस्कृती जीव, जगत् आणि जगदीश्वर यांचे विशदीकरण करते. आत्मतत्त्व आणि ब्रह्मतत्त्व या अंतिम सत्याच्या अधिष्ठानावरच हिंदुसमाजाची रचना झालेली आहे. जीवनाशी निगडित असलेली आमची अभिजात कला आणि अंतिम सत्याकडे नेणारे आमचे तत्त्वज्ञान, आमच्या परंपरा आचारधर्माद्वारे आमच्या अंत:करणाच्या खोल गाभ्यात शिरून आमची गहन गंभीर श्रेष्ठतम् संस्कृती जन्माला आली. तिने इंद्रियांपलीकडच्या विश्वाची ओळख करून देण्याची जिद्द बाळगली. मनुष्य (man) आणि मानव (human) कुटुंबासंबंधी सतत जाण बाळगली.
२. हिंदूंनी आपला धर्म आणि संस्कृतीला नावही दिले नाही.
३. हिंदूंनी जाणूनबुजून अथवा हेतूपूर्वक त्याचा संप्रदाय बनवला नाही. त्याला इस्लामच्या उम्माह (Ummah) या इस्लामी प्रणालीचा गंध नाही. तसेच ख्रिश्चन धर्माचा दुरूनही वास येत नाही.
४. सनातन धर्माने स्वत:कडे एखाद्या तत्त्वाचा (idealism),धर्माचा निधर्माचा (secular) आघाडीवरचा अग्रगण्य सैनिक, अशी भूमिकाही घेतली नाही.
५. हिंदुधर्माचे स्वत:ला सर्वोच्च करणारे परक्यांना जबरीने हिंदु करून घेणारे, अशा प्रकारचे तत्त्व (idealism) कधीच नव्हते, नाही आणि नसेल.'

हिंदुत्व सोडल्याचे परिणाम !

आसनाच्छयनाद्यानात् संभाषात्सहभोजनात् ।
संक्रामन्ति च पापानि तैलबिंदुरिवांभसि ।।
अर्थ : एकत्र बसणे, झोपणे, प्रवास करणे, संभाषण करणे, जेवणे इत्यादी व्यवहारांनी ती पापे आणि गुणकर्मे पाण्यात तेलाचा बिंदु पसरावा त्याप्रमाणे संक्रमित होतात.हिंदूंनी शास्त्रानुसार आचार, विचार आणि स्पर्शास्पर्श कटाक्षाने सांभाळावेत. अपवित्र आचरण करणार्‍याशी कधीही स्पर्धा करू नये.

मुसलमानांच्या लांगूलचालनाचा देशावर होणार्‍या दूरगामी परिणामांची चिंता नसणारे पंतप्रधान
एका तथाकथित हिंदुत्ववादी पक्षाचे एक नेते पंतप्रधान असतांना मुसलमानांचा रमजानचा उपवास संपला होता. त्यांना बिर्याणी इत्यादींची मेजवानी देण्याकरता त्या पंतप्रधानांनी इतमामाने मोठा समारंभ साजरा केला. त्यांचे अनुकरण देशभर झाले. अनेक नगरपरिषदांनीही मुसलमानांसह बिर्याणी (मांसाहार) आयोजित केली. उत्तर्रैंप्रदेशात नगरपरिषदेतर्फे मेजवान्या झाल्या. या बिर्याणी समारंभात इतकी भयंकर गर्दी झाली की, अनेक हिंदु चिरडून मेले. रमजान, रोझाच्या समारंभात मंत्र्यांनी मुसलमानी टोप्या चढविल्या. तो पोषाख केला. त्यांचे अनुकरण देशभर झाले. हिंदूंनी आपले स्वत्व सांभाळले पाहिजे. असे खान-पान आणि पोषाख यांमुळे संकर होतो. गुणकर्माचा संकर होतो आणि काही दिवसांतच हिंदु मुसलमानाचे अनुकरण करतो. मग तो मुसलमान मुलीशी लग्न करून इस्लाम धर्म स्वीकारतो आणि हिंदु धर्माचा द्वेष्टा होतो.'

सनातन हिंदु धर्माचे पुनरुत्थान करण्यासाठी कटिबद्ध होऊया !
`एकेकाळी सनातन हिंदु धर्म हा एका श्रेष्ठतम महान संस्कृतीचे नेतृत्व करायचा; परंतु आज मात्र हिंदु धर्माचे पुनरुत्थान हे जमातवाद, वर्णवाद वा जातीयवाद यांत गणले जाते. हिंदु धर्माचे शत्रू इस्लाम, िख्र्चाश् साम्यवादी वगैरे आहेत. तेच केवळ हिंदु धर्माला जातीयवादी म्हणतात असे नव्हे, तर स्वत:ला सेक्युलर, पुरोगामी, बुद्धीवादी म्हणवणारे हिंदु स्त्री-पुरुषही धर्माचा द्वेष करतात. त्यांनी हिंदु धर्मापासून फारकत घेतली आहे. सनातन हिंदु धर्माचे पुनरुत्थान होऊन त्याचे पवित्र स्थान त्याला प्राप् व्हावे, जगाला त्याचा सहयोग लाभावा, याकरताच आम्हाला प्रयत्नांची शिकस्त करायची आहे.'

राष्ट्र व धर्म यांच्या प्रेमींनो धीर धरा !
`धर्मग्लानीचा हा काळ आहे. धर्माच्या अभ्युत्थानाचा काळ लवकरच येईल', असे सांगतांना गुरुदेवांनी अन्योक्तीचा अवलंब केला. ते म्हणाले, ``अरे बा कोकिळा, तू काहीएक बोलता एखाद्या जीर्ण वृक्षाच्या ढोलीत मुकाट्याने बैस. या वेळी शिशिर आहे. यास्तव तुझे हितावह भाषण कोणी ऐकणार नाही; पण हा काळ जाऊन लवकरच वसंत आला, म्हणजे तू आपली बोलण्याची हौस पूर्ण करून घे; कारण त्या वेळी तुला हवे तितके श्रोते मिळतील.''

सनातन धर्म आणि ईश्‍वरनिष्ठा यांविना राष्ट्र वाचणार नाही !
`मेवाडच्या लोकांनी मुसलमानांचे वारे रोखून ठेवले होते, त्याचा जगाच्या इतिहासात तोड नाही. असे अपूर्व दिव्य तेज, पराक्रम त्यांनी प्रगट केला. समर्थ रामदास आणि शिवाजी राजांनीही तेच केले. अशी ज्वलंत ईश्‍वरनिष्ठा असल्याविना राष्ट्र म्हणून कोणताही समाज टिकत नाही. आज तेजस्वितेवाचून राष्ट्र अध:पतनाच्या गर्तेत कोसळते आहे. राष्ट्र वाचविण्याकरिता तेजस्विता निर्माण करा. ती सनातन धर्म आणि ईश्‍वरनिष्ठा यांविना निर्माण होणार नाही!'

भारताचा खरा इतिहास शिकवणे, हाच जात्यंधतेवरील उपाय !
राखीव जागांचा प्रश्‍न ८० टक्के नेऊन वा मागासलेल्या जमातीला भारताची संपूर्ण सत्ता देऊनही त्यांचा वर्णद्वेष मिटायचा नाही, मिटणे शक्य नाही. त्याकरिता त्यांची अंत:करणे हाती घेतली पाहिजेत. इतिहास पुन्हा लिहिला पाहिजे. खरा इतिहास समोर आणला पाहिजे. भारतीय संस्कृतीविना, राष्ट्राची एकात्मता, वैभव, समृद्धी, शांती आणि विश्‍वशांतीदेखील अशक्य !'
(.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका: घनगर्जित साप्‍ताहिक सनातन चिंतन)

Friday, September 25, 2009

समस्याग्रस्त पाश्चात्त्य देश आणि हिंदु धर्मातील सात्त्विक आचार आणि आचरण हेच त्या सर्व समस्यांचे उत्तर!


भोगवादी पाश्चात्त्य देश आणि भारतीय संस्कृती यांविषयी ऊहापोह करणारा हा लेख

१. पाश्चिमात्य तंत्रज्ञान भारतात येण्यापूर्वी देश समृद्ध होता !

टीका : `हे पुरोगामी समाजसुधारक मित्र आवर्जून सांगतात, ``आमचा भारत अप्रगत राहिला, दरिद्री राहिला; कारण आम्ही तंत्रज्ञानाचा अंगीकार केला नाही. अद्ययावत तंत्रज्ञानाची उपेक्षा केली. त्यामुळे देश दरिद्री झाला. अमेरिका, रशिया, जपान, युरोपातील देश, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ऐश्वर्याच्या कळसाला गेले. आम्ही जुनाट धारणा टाकून अद्ययावत झाले पाहिजे. त्यांच्यासारखे अद्ययावत झाले पाहिजे.

खंडण : या शतकापासून आम्ही पाश्चिमात्य तंत्रज्ञान संपूर्ण अंगीकारले आहे. १९८२ सालीच अद्ययावत एकविसाव्या शतकाच्या रोखाने दौड चालविली आहे. आज औद्योगिकरण (प्रचंड कारखाने) भारतभर शहरातूनच नव्हे, तर गावागावातही सुरू झाले आहेत. तशा योजना सतत राबवित आहोत; परंतु इतिहासात कधीही नव्हते इतके दारिद्र्य आज आहे. शेकडा ४७.५ टक्के भारतियांच्या घरात दोन वेळा चूल पेटतच नाही. त्यांना पोटभर अन्न मिळतच नाही. गोरे पाय या पुण्यभूमीला लागण्यापूर्वी १८ व्या शतकात भारत समृद्धीच्या कळसाला होता. सुवर्णाचा धूर निघायचा. भुकेकंगाल, अडाणी वा अज्ञानी अपवादादाखलही नव्हते. क्षूद्रादीदेखील सगळे सुशिक्षित होते. आज साक्षरतेकरता कोट्यवधी संपत्ती खर्चूनदेखील ३० टक्क्यांपेक्षा अधिक लोक निरक्षर आहेत आणि ६५ टक्क्यांपेक्षा अधिक जनता दारिद्र्य रेषेच्या खाली आहे.

२. पश्चिमेतील सामाजिक अवस्था आज विलक्षण हीन-दीन आहे !

टीका : सामाजिक अवस्था अत्यंत निकृष्ट आहे; कारण आर्थिकदृष्ट्या आम्ही मागासलेले आहोत.

खंडण : चमत्कार आहे ! रशिया, अमेरिका आणि युरोपातील जी राष्ट्रे आर्थिक सुबत्तेच्या कळसावर आहेत, तेथील सामाजिक अवस्था आज विलक्षण हीन-दीन आहे. थोडा इतिहास चाळा. अमेरिका आणि युरोप येथील राष्ट्रे, ज्या काळी आर्थिकदृष्ट्या विलक्षण प्रगत होती, त्याच काळात आर्थिक असंतोषाच्या थरकाप उडवणाऱ्या चळवळी झालेल्या नाहीत का ? आर्थिक सुबत्तेने त्यांनी कोणत्या सामाजिक समस्या सोडवल्या ? आर्थिक समृद्धीने का कधी सामाजिक समस्या सुटल्या आहेत ? त्रिकोणाचा चौकोन कसा बनविता येईल ?

३. आत्महत्या, खून आणि जबरी संभोग यांचे प्रमाण वाढत असलेला पश्चिमेतील प्रगत समाज !

टीका : पश्चिमेतील समाज प्रगत आहे. आम्ही त्या मानाने फार अप्रगत मागासलेले आहोत.

खंडण : कोणता समाज प्रगत ? प्रगतीचे लक्षण कोणते ? व्याप्ती कोणती ? अमेरिका, युरोप या आर्थिक समृद्धीच्या देशांत जबरदस्तीने संभोग, खून, हत्याकांडे, आत्महत्या, फसवेगिरी यांचे प्रमाण सतत चढते आहे. या देशातील गुन्हेगारीची आकडेवारी असलेले गणितागत अहवाल पाहिल्यास प्रमाण चढते व वाढते आहे. कमी नाही. भारतीय रक्तातच हे अनाचार नाहीत. खून व आत्महत्या तर विरळच. क्वचित अपवादासारखी जबरी संभोगाची एखादी घटना घडते. पश्चिमेच्या संसर्गाने, प्रभावाने आता आम्ही भारतीय प्रगत होऊ लागल्याने आमच्यातही खून, आत्महत्या, बलात्कार या गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे.

आत्महत्या, खून आणि जबरी संभोग यांकडे कधीही न वळणारी भारतियांची मनोवृत्ती त्यांच्या आचारांतून प्रगट होते. आमचे पूर्वज, आचार्य, शास्त्रकार, ऋषीमुनी यांनी आचारांच्या माध्यमातून लक्षावधी वर्षांपासून ती मनोवृत्ती जोपासली व संवर्धिली. ती परम सात्त्विक वृत्ती, ते शुभ वळण, पश्चिमेचा विकृत, तामसी आहार, विहार, आचार यांनी नष्ट करून टाकायची आणि पश्चिमेचे वळण गिरवायचे ? ही प्रगती झाली का ? जबरी संभोग, खून, हत्याकांड व गुन्हेगारी यांचे प्रमाण ज्या राष्ट्रात कमी आहे, ते राष्ट्र वास्तविक प्रगत नाही का ? गुन्हेगारी, बलात्कार व आत्महत्या यांचे प्रमाण कमी कसे करायचे, ही चिंता अमेरिका, रशिया, युरोपातील समृद्ध राष्ट्रे यांना गेली १५० वर्षे ग्रासून आहे. ते जितक्या योजना राबवतात, जितके कायदे राबवतात तितके ते प्रमाण चढत जात आहे आणि आज तर कहर आहे.

४. पश्चिमी आसुरी पशुस्तरीय तामसी धारणेलाच प्रगती' म्हणायचे का ?
तो आचार, ती जीवनप्रणाली नष्ट करून पश्चिमेची आसुरी, तामसी वृत्तीप्रधान धारणा, भारतीय रक्तात संक्रमित करून राष्ट्र, समाज आसुरी बनवायचा का ? ही प्रगती झाली का ? या पश्चिमी आसुरी पशुस्तरीय तामसी धारणेलाच प्रगती' म्हणून राबविणार्‍या आमच्या शासनाला, नेतृत्वाला काय नाव द्यावे ? काय हा दैवदुर्विलास !

५. हिंदु धर्मातील सात्त्विक आचार आणि आचरण हेच सर्व प्रश्नांचे उत्तर
जगातील सगळे तंत्रज्ञान, सगळी अणुशक्ती या समस्या सोडवू शकत नाही. मनोवृत्ती बदलविण्याची त्यांची जडणघडण, सात्त्विक करण्याची क्षमता काही जगातील सर्वच्या सर्व अणुशक्तीत नाही. त्याकरता आचार आणि आचरण हवे. आचरण, परंपरा हाच तर भारतीय जीवनाचा अंतरात्मा आहे. आचार:प्रथमो धर्म: । म्हणजे `आचारातून मनोवृत्ती वळविता येते.' तेच आमच्या पूर्वसुरींनी केले आणि लक्षावधी वर्षे आमचे राष्ट्र, आमचा समाज एकात्म, तेज:पुंज, ज्वलंत राखला.'
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साप्ताहिक सनातन चिंतन, २२ नोव्हेंबर २००७)

Saturday, September 19, 2009

विज्ञानाला नम्र व्हावेच लागेल!


Scientific temperament म्हणजे बेगुमान औद्योगिकरण, ब्रिटीश वसाहतवादी धोरण आणि निर्बुध्द पाखंडीपण ! (म्हणजे केवळ इहवाद.) या इहवादाच्या आश्रयाने आता निर्बुध्द ख्रिस्तीकरण सुरु आहे. हे द्रुष्ट इहवादी, भरतखंडाच्या प्राचीन सांस्कृतिक वारशाची सहेतुक उपेक्षा करतात। Scientific temperament च्या आवरणाखाली इंद्रिय भोगसुख भोगतात. स्वैराचारी पशु सारखे जगतात. Scientific temperament ची लक्तरे कशी क्षीण फडफडतात ते पहा.......

श्रांडिजर
हा wave mechanics चा शास्त्रज्ञ सांगतो, "विज्ञानाला आपल्या मर्यादा कळल्या आहेत।ते आता नम्र झाले आहे. सृष्टीचे ज्ञान काही केवळ एकमेव वैज्ञानिक पध्दतीनेच संपादन केले जाते असे नाही. तेच केवळ ’प्रमाण’ नाही."
"Science has become self-conscious and comparatively humble। We are no longer taught that scientific method (scientific temperament) of approach is the only valid of acquiring knowledge about reality. Eminent men of Science are insisting with what seems a strange enthusiasm of the fact that science gives us but a partial knowledge of reality, we are no longer required to regard as illusory everything that science finds itself to ignore.

विज्ञान सृष्टीचे अंशत: ज्ञान देऊ शकते। धर्म, संस्कृति (परलोक, कर्मविपाक, मोक्ष) अशा ज्या क्षेत्राची विज्ञान उपेक्षा करते, ते सारे कल्पनाजाळ आहे असे मानण्याची गरज नाही."

अमेरिका, युरोपात scientific temperament चा आज बोजवारा उडाला आहे. पहा , क्वांटम फिजिक्सचा जनक क्स प्लेंक सांगतो, "जडवस्तू ही चेतनापासून निघाली आहे। आपण एखाद्या वस्तुविषयी चर्चा करतो, अथवा एखादी वस्तू अस्तित्वात आहे असे म्हणतो, तेव्हा तिथे चेतनवस्तूचे अस्तित्व पूर्वसिध्दच असते.

I regrade matter as derivative from consciousness। Everything we talk about, everything we regard as existing postulate consciousness."

Every technical advance is a misfortune। प्रत्येक शोधाचे दुष्परिणाम मोठे आहेत.

जे नैसर्गिक जलप्रवाह होते, नद्या होत्या, जलाशये होती, ती या विज्ञानाने धरणे बांधून, कालवे-पाट काढून, बंधारे बांधून सुकवून टाकलेत. त्यामुळे भारताचा जो अत्यंत आरोग्यसंपन्न भाग होता, तिथे मलेरिया आला. अत्यंत सुपीक अशी लाखो एकर जमीन नापीक झाली. हे परिणाम कालव्यामुळे झालेत. canal irrigation ने आम्हाला मलेरिया दिला. सुपीक जमीनी वाळवंटासारख्या नापीक बनविल्यात. पंजाबात जे कालव्यांचे जाळे पसरले त्यामुळे सर्व पंजाबच मलेरियाने हैराण झाला. बंगालमध्ये रेल्वेचे जाळे जसे पसरले तसा मलेरिया पसरला.

परमात्मा म्हणजे बुध्दि, ईश्‍वर म्हणजे intelligence, प्रेम नव्हे! ही संकल्पना एकदा का स्वीकारली की हे निश्‍चित जाणा की मानववंशाचे पृथ्वीवरचे अस्तित्व संपेल.

Scientific Temper सैतान बनविणारा कारखाना आहे.या द्रुष्ट सैतानांनी Scientific Temper च्या आवरणाखाली मानवाला त्याचा मृत्युसमयीचा अंतिम आश्रय जो परमेश्‍वर तो नाकारायला लावला. हे जे Scientific Temper आहे, ते स्वातंत्र्य, समानता बंधुता अशांना objective अर्थ देते. म्हणजे परिस्थितीवर संस्कार करा. व्यक्तीवर नव्हे. परिस्थिती बदला, अशे शिकवते.

कोण भीषण हलाहल आहे हे? म्हणे परिस्थिती बदला! म्हणजे काय? मानवाच्या ह्रदयात खंजिराचे प्रहार करणारे हे तत्व आहे. या Scientific Temper ने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
या Science Temper ने सर्व शास्त्रांचा खून केला आहे. मानवतेचे अस्तित्व, ती मूल्ये पूर्णत: नष्ट करणारे हे तत्व आहे.

सोपं सांगायचे तर संस्कार परिस्थितीवर करायचे. व्यक्तीवर नव्हे. इथे व्यक्तीचे सर्वच्या सर्व सद्‍गुण, नीति, मर्यादा, झुगारून दिल्या जातील. मग मानव नव्हे तर उरेल तो सैतान!

विज्ञानाला नम्र व्हावेच लागेल. त्याला नम्रतेचे पाठ घ्यावेच लागतील. परंतु ते असंभव आहे. जो पर्यंत,............
१) विज्ञान त्याचे दुषणास्पद अपयश लक्षात घेत नाही,..........
२) अभावातून अभावच येईल. भाव निर्माण होणार नाही. - हे सत्य स्वीकारत नाही,.......
३) जगाची विभागणी जड चेतनात झालेली नाही तर ती स्थावर जंगमात आहे. हे सत्य स्वीकारत नाही.
४) ’निसर्गावर मात केली’ हा उन्मत्त अहंगडं टाकत नाही............

........तोपर्यंत विज्ञान नंम्र होणार नाही.

Scientific temperament वाले Right temperament कधी शिकतील? आमची दुर्दशा कधी समाप्त होईल?

संदर्भ: निमित्त गणपती दूध पितो... प्रसंगाचे! (प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी)

Monday, September 14, 2009

हिंदू विवाह पद्धति

हिंदूंच्या विवाहाचे प्रकार.......

ब्राह्म , दैव , आर्ष , प्रजापत्य , आसुर , गंधंर्व , राक्षस आणि पैशाच हे जे आठ आहेत , ते विवाहाचे प्रकार नाहीत तर विवाह विधीचे प्रकार आहेत.

विवाहाचे खरे प्रकार दोनच:
१. धर्म्य आणि
२. काम्य.


१. आमरण विवाहाचे स्वारस्य तो आमरण राहाण्यातच आहे. कारण - भावना, मनोविकार, अभिरुची, तात्कालिक लहरी अशा सर्व अडचणीतून हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याची, वाटेल ते कष्ट सोसून अथवा दु:ख भोगून तडीस नेण्याची क्षमता त्या दोन व्यक्तीत आहे , ते निर्विवाद सिध्द होते.
२. विवाहाचे वय वाढत जाणे हे जीवनार्थ कलहात, समाजाची पात्रता कमी होत जाण्याचे स्पष्ट निदर्शक आहे.
३. विवाह न करणार्‍यांपेक्षा विवाह करून घटस्फोट घेणारा पुरुष अथवा स्त्री हे दोघेही अत्यंत तिरस्कारणीय व अधम आहेत. कारण विवाह न करणारा आपली नालयाकी जाणून स्वस्थ असतो तर विवाह करणारा स्वत:ला लायक समजून पुढे नालायक ठरतो. नंतर आपली नालायकी झाकाण्याकरता अभीरूची, प्रेम, व्यक्ती स्वातंत्र्य, स्वभाव न जुळणे वगैरे..... कल्पना पुढे मांडतो. यालाच आधुनिक 'व्यक्ती स्वातंत्र्य' म्हणतात. संतती नियमन हा समाजशास्त्र दृष्ट्या विचारात घेण्याच्या लायकीचा देखील प्रश्‍न नाही.
४. स्त्री ही पुरुषाचे अर्थार्जनाचे कार्य करू शकेल. परंतु पुरुष हा स्त्रीचे प्रजोत्पादनाचे कार्य करू शकणार नाही. स्त्री ही पुरुषाचा जर आर्थिक गुलाम असेल तर पुरुष हा स्त्रीचा कौटुंबिक गुलाम आहे. स्त्री व पुरुष हे पूरक घटक आहेत, असणारच ! They are complimentary and contributory.
५. प्रौढ विवाह व प्रेमविवाह म्हणजे प्रेम हाच विवाहाचा पाया असावा, असे प्रतिपादणार्‍या सुधारक गोपाळ गणेश आगरकरांवर सडकून टीका करतांना गुरुदेव म्हणाले, " प्रेम हा विवाहाचा पाया असावा अशा काही आंग्लछायेच्या विकृत सडक्या मेंदूच्या व्यक्तींनी जी मते समाजात फैलावली आहेत, त्याविषयी सनातन हिंदू संस्कृतीला तिरस्कार वाटतो.


कादंबरीत विवाह हा कामयाचनेची पूर्ती म्हणून मानलेला असतो. कायद्यात विवाहाचा वारसा ठरविण्याच्या द्र्ष्टीने विचार केला जातो. समाजात विवाहावरून घराण्याची उच्चनीच स्थिती ठरत असते. परंतु सनातन हिंदू धर्म विवाहपध्दतीचे जे ग्राह्य-अग्राह्य निष्कर्ष आहेत ते सुप्रजनन शास्त्राला धरून होतात.

सुप्रजनन शास्त्रे याचा अर्थ हिंदु पध्दतीने वंश अगर जाती , कुळ आणि व्यक्ती या सर्व गोष्टी विचारात घेऊन सनातन शास्त्रीय पध्दतीने विवाह झाला तर पुढची पिढी नि:संशय अत्यंत श्रेष्ठ होतेच होते , असा श्रेष्ठतम समाज जगात सूर्यसारखा तळपतो आणि सर्व विश्वाला प्रकाश देतो. यात कसला संशय ?

  • जी अंगहीन नाही, जिचे नाव सरळ सुंदर आणि सोपे आहे, जीची चाल हंस व हत्ती प्रमाणे आहे, जिचे केश (रोम) आणि दन्तपंक्ती छोटे आहे अशा कोमलांगी सुकन्येशी विवाह करावा.
  • जे द्विज ( ब्राम्हण , क्षत्रिय , वैश्य ) मोहवश होऊन हीन जातीच्या स्त्री सोबत विवाह करतात ते संतती सहित आपल्या कुळाला क्षुद्रता आणतात.
  • जिचे पिवळे केस व जास्तीचे अवयव असतील, रोगयुक्त, जिच्या शरीरावर केस (रोम) नसतील वा अधिक असतील, जी खूप वाचाळ आहे आणि डोळे पिवळे आहेत अशा कन्येसोबत विवाह करू नये.
  • जो जातिकर्म क्रियेने रहित आहे, ज्या कुळात पुत्र उत्पन्न होत नाही, ज्या कुळात वेद पठण होत नाही, ज्या मनुष्याच्या कुळात शरीरावर रोग असतात, ज्या कुळात बावीसार, क्षय, मंदाग्नी, मिर्गी, पांढरे कोड आणि कुष्ठ रोग आहेत, त्या कुळासोबत विवाह निषिध्द आहे.

Sunday, September 6, 2009

म्हणे Scientific Temperament!


हिंदुस्थानभर वार्‍यासारखी ’गणपती दूध पितो’ ही वार्ता पसरली. 'हिंदू भोळसट, सहज फसणारा, रानटी, मूर्ख आहे.' अशी भयानक चिखलफेक इं‍ग्रजी प्रसारमाध्यमांनी हिंदू लोकांवर केली. यासंदर्भात William Rees Moog यांचा प्रदीर्घ लेख लंडन टाइम्समध्ये प्रसिध्द झाला. तो लेख Times of India ने पुनर्मुद्रित केला.

ते म्हणतात , "It has demonstrated the spontaneous capacity the live sensitivity of a whole people to such extra-ordinary events। The feel for that supernatural, the cosmic the non-rational is very much as active ingredient in the natural Hindu-mind."

'बुध्दीच्या पलीकडे श्रध्देचा प्रांत आहे.' हे विल्यम साहेब ओळखतात। आमच्या Intelligentsia हे तत्व केंव्हा ओळ्खेल ? हिंदुस्थानला आज मरणप्राय पीडा देणारे दोन भयावह दहशतवाद आहेत.
  • हे जे आतंकवादी आहेत, ते अत्याधुनिक शस्त्रांनी हिंदूंचे हत्याकांड करतात.
  • दुसरा दहशतवाद Scientific Temperament चा आहे.
हे दुसरे दहशतवादी अमेरिक,युरोप वा तत्सम विद्यापीठांतून शिकलेले मोठ्‍या पदव्या व सन्मानाने गौरविलेले अंतरराष्ट्रीय व देश विदेशातील संघटनाचे सूत्र संचालन करणारे Intelligentsia संज्ञेने भूषविलेले आहेत. ते कडवे संस्कृतिव्देष्टे असून पाश्‍चात्य प्रणालीचे 'दास' आहेत. दोन्ही दहशतवाद्यांना देश परदेशातून प्रचंड आर्थिक, मानसिक, बळ मिळते. प्रतिष्ठा मिळते.

सावधान ! सावधान !!

पाश्‍चात्य सभ्यतेच्या (civilization) प्रभावाखाली असलेले आधुनिक, त्या पाश्‍चात्य विचारांशी, भावनांशी, जीवन जगण्याच्या पध्दतीशी इतके एकरूप झालेले आहेत की, त्यांच्याच अनुरोधाने ते विश्‍वाच्या रचनेचा कार्यपध्दतीचा अर्थ लावीत आहेत. आमची सर्वच्या सर्व प्राचीन दर्शन शास्त्रे, तत्वप्रणाली, समाजशास्त्रे परंपरा यांना ते तुच्छ मानतात. त्यांना विचार करता येत नाही. ते केवळ संकलन करून अर्थ लावू पाहतात आणि जीवन नरकमय बनवतात.

Scientific temperament मुळे पृथ्वीवर लाखो टन कचरा गोळा झाला आहे. इतकेच नव्हे तर अंतराळातही हजारो टन कचरा गोळा झाला आहे.

पृथ्वीच्या जवळच्या कक्षेतील ( Lower Earth Orbit ) अमेरिकेचा १९९७ मध्ये सोडलेला उपग्रह आणि रशियाचा भरकटणारा मृत उपग्रह यांची जोरदार टक्कर झाली. अंतराळात ३ लाख अशनी भरकटत आहेत. ९०० सक्रिय उपग्रह आहेत. त्यातले अर्धे अधिक मृत आहेत. त्यांचे अवशेष (कचरा) अंतराळात पसरलेले आहेत. अंतराळातला प्रचंड कचरा पृथ्वीच्या कक्षे बाहेर फेकण्याकरता संयुक्त राष्ट्र, योजना करते आहे. ते कितपत शक्य होईल ? Every technology is a misfortune ते काही तरी उपद्‍व्यापक करतील. तो कचरा तसाच राहील आणि या उपद्‍व्यामुळे नवीन कचर्‍याच्या समस्या उद्‍भवतील। निसर्ग हे भंगार दूर करीलच. पण त्याला खूप काळ लागेल. परंतु Scientific temperament वाले तोपर्यंत स्वस्थ कसे बसतील ?

संदर्भ: निमित्त गणपती दूध पितो... प्रसंगाचे! (प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

--------------------------------------------------------------------------------------------------

लबाडीने प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांना हरवू इच्छिणार्‍यांना त्यांनीच हरवणे!

देव आहे का ?' या विषयावर प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे सुमारे दीड तास सूत्रबद्ध प्रवचन झाले. सगळया शंकांचे निरसन झाले होते. प्रवचनाकरता रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य आणि अन्य उच्चभ्रू, सुशिक्षित उपस्थित होते. पुष्कळसे नास्तिक होते. गुरुदेवांशी `वाद' करून त्यांना जिंकणे अशक्य आहे, हे त्यांनी हेरले; म्हणून त्यांनी डाव टाकण्याचे ठरवले. सभा संपताच ते सगळे शिक्षित, उच्चभ्रू नास्तिक गुरुदेवांच्या दिवाणखाण्यात जमले. डॉ. देव म्हणाले, ``गुरुदेव, देव आहे कि नाही हे ठरविण्याची आम्ही एक कसोटी ठरविली आहे. इथे आम्ही दोन चिठ्ठ्या ठेवू.

`देव आहे', ही एक असेल, तर `देव नाही', ही दुसरी. आपण त्यातली एक चिठ्ठी उचलायची, तो निर्णय घोषित होईल.'' गुरुदेवांनी संमती दिली. गुरुदेवांसमोर दोन चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या. त्या शिक्षित धूर्त नास्तिकांनी दोन्ही चिठ्ठ्यांवर `देव नाही', असे लिहिले होते. गुरुदेवांच्या हा डाव लक्षात आला. क्षणभर त्यांनी डोळे मिटून घेतले. एक चिठ्ठी उचलली आणि जवळ असलेल्या भास्करन यांना दिली. भास्करन यांनी त्या चिठ्ठीचा गोळा करून तोंडात टाकला. दुसरी चिठ्ठी पहाताच त्यावर `देव नाही', असे होते. याचा अर्थ भास्करनांनी गिळलेली पहिली चिठ्ठी `देव आहे' हीच असली पाहिजे. त्यानुसार `देव आहे' हा निर्णय घोषित करण्यात आला !'

( घनगर्जित, जून २००९)

Saturday, August 29, 2009

देव आहे का? नियती


१. अफजलखान बलदंड, त्याला न्याहारीला रोज एक बकरा लागायचा. शिवाजीने त्या राक्षसाला वाघनखे पोटात खूपसून ठार केले.
२. दिल्लीहून औरंगजेबाच्या नजरकैदेतून शिवाजी राजे दक्षिणेस सुरक्षित आले (ही देवाची इच्छाच. तेच "अदृष्ट " )
३. ड्युक ऑफ़ वेलिंग्टन हा विशाल बुद्धीचा आणि अतुट धैर्याचा कडवा सेनानी होता. तो लढाईत समरभूमीवर गोळीबारांचा प्रचंड वर्षाव होत असतांना आपल्या सैनिकांना हिंमत देत फिरतो.
सैन्यातून हिंडतो. त्याच्या आजुबाजूला असलेले असंख्य शिपाई गोळ्या लागून धारातीर्थी पडतात. त्या तुफानी गोळीबाराच्या वर्षावात त्याला मात्र गोळी स्पर्शत नाही. ( तसे घडले असते तर इतिहास वेगळाच झाला असता )
४. दुसरा बाजीराव हा थोर योद्धा होता. ब्रिटिशांशी त्याने प्रभावीपणे सामना दिला. त्यावेळी एलिफीस्टन गोर्‍या बायकांबरोबर पत्ते खेळत होता. बाजीरावाचा पराभव झाला. एलिफीस्टनचा ब्रिटीशांनी बहुमान केला.
५. अगदी अल्प काळात हिटलर या एका साध्या सैनिकाने जर्मन राष्ट्र बलवान बनवलं. सूर्य मावळत नाही, असं ब्रिटीशांचं जगभर पसरलेलं राज्य खिळखिळ करून टाकलं. भारताच्या स्वातंत्र्याची वाट मोकळी करून दिली. स्टेलीनच्या साम्यवादी वर्चस्वाला पायबंद घातला. कॉलरा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने त्याला रशीयन भूमीवरून काढता पाय घ्यावा लागला. त्याचा सर्वत्र पराजय झाला. तसं घडले असते तर कम्युनिझम उरलाच नसता.
६. सुभाषचंद्र बोस! त्यांच्या आझाद हिंद सेनेचा मेजर गढ़वाल, इंफाळच्या चढाईत ब्रिटीशांना मिळाला. रियास, मदन डे, महंमद बक्ष आणि शर्वर हे सेनापती ब्रिटीशांना मिळाले. त्यांनी सगळी कागदपत्रे व माहिती गोर्‍यांना दिली. टोकिओला जायला निघालेले सुभाषचंद्र बोस फार्मोसा बेटावर विमान अपघात होऊन मरण पावले. ( असे घडले नसतं तर भारताचा इतिहास वेगळाच घडला असता.)
७. अलेक्झांडरच्या चरित्रानेच ज्युलीअर सीझर प्रभावी झाला आणि अजिंक्य ठरला.
८. बेकनच्या निबंधामुळे ब्रिटीश राजकारणाने विलक्षण वेगळे वळण गिरवले .
९. नेपोलियन, वाशिंग्टन नेल्सन, ज्युलीअस सीसर या जगज्जेत्या वीरांचीही तशीच अवस्था आहे. परिस्थितीच अशी निर्माण होते की तिथे कर्तृत्त्व तोकडे पडते. शक्ती, बल, प्रज्ञा यांचा काहीही उपयोग होत नाही. यश हे प्रयत्नाबाहेरच्या साधनावर अवलंबून असते. तीच नियती!

देवाची इच्छा वा कृपा, हेच या सर्व महापुरुषांच्या यशाचं कारण! म्हणूनच ते भीषण प्राणसंकटातून बचावतात. अलौकीक गुण असणे, ही ईश्वरी देणगी आहे. त्या पुरुषांकडून मोठे कार्य पार पडेल, यशश्री त्याला प्राप्त होणे हे पुण्याईचे फळ. यालाच कुणी काळाची अनुकूलता म्हणतील. काळाची सद्दी होती म्हणतील. नास्तिक सांगतील, " हे सर्व अज्ञेय आहे. अतर्क्य आहे."

'देवाची इच्छा' हा या सर्वांचा एकच अर्थ!

Sunday, August 23, 2009

राज्यकर्त्यांनो, हे लक्षात ठेवा !



अजितेंद्रिय राजे धुळीला मिळणे जितेंद्रिय राजांनी पृथ्वीचे राज्य दीर्घकाळ करणे!

दंडधारीने म्हणजे राजाने वा स्वामीने दंडाची अन्यायी बजावणी केली, तर तो दंड दंडधारीचाच अखेरीस नि:पात करतो. इंद्रियजयी राजा हा कधीच कुटील होऊ शकत नाही. इंद्रियजय न साधलेले राजेच धर्ममर्यादा उल्लंघून स्वार्थाकरता कारस्थाने रचतात व नष्ट होतात. इंद्रियजय आणि विनय हे राजाचे संरक्षककवच आहे. राजा इंद्रियजयी नसला व अविनयी असला, तर तो नष्ट होतो।





१. काम : दांडक्यभोज आणि करालवैदेह यांचा राष्ट्र व बांधवजन यांसह नाश झाला; कारण ब्राह्मण-कन्यांत त्यांचे मन गुंतले होते.
२. क्रोध : क्रोधाने जनमेजय आणि नालबंध हे नष्ट झाले.
३. लोभ : लोभाने चातुर्वर्ण्य व्यवस्था छिन्न-भिन्न करू पहाणारा ऐल व अजबिंदू सौविर यांचा नाश झाला.
४. अहं : गर्विष्ठपणामुळे म्हणजे अहंकाराने ताठरल्यामुळे रावणाने परस्त्री परत पाठवली नाही; म्हणून त्याचा बांधवांसह सर्वनाश झाला.
५. अन्याय : पांडवांना राज्याचा हक्काचा भाग न दिल्यामुळे दुर्योधन नष्ट झाला.
६. प्राण्यांचा अपमान : दंभोद्भव व हैहय अर्जुन हे प्राण्यांचा अपमान केल्यामुळे व उन्मत्त झाल्यामुळे नष्ट झाले.
इतिहासाच्या पानोपानी असे अनेक राजे षड्रिपूंच्या स्वाधीन झाल्यामुळे नष्ट झाले. अजितेंद्रिय राजे धुळीला मिळाल्याचा इतिहास आहे. जितेंद्रिय जामदग्न, नाभाग आणि अंबरिष हे दीर्घकाळ पृथ्वीचे राज्य करीत होते. (मनुस्मृति ८.१२८)' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जून २००५)

कुठे हिंदूंचा राजधर्म, तर कुठे हल्लीचे (पाश्चात्त्यांचे) कायदे !
१. प्रजानां विनयाधाताद्रक्षणाद् भरणादपि ।
रु पिता पितरस्तासां केवलं जन्महेतव: ।।१.२४।।' - रघुवंश
अर्थ : `राजा प्रजेचा पिता आहे. तो प्रजेला शिक्षण देतो. प्रजेचे पोषण करतो. आई-बाप हे प्रजेचे जन्मदाते आहेत.

स्पष्टीकरण
१. लहान मुलाचे शाळेचे पुस्तक हरवले, तर पित्याला जसे दुसरे आणून द्यावे लागते, तसेच देशाच्या विशाल कुटुंबातील एखाद्याची चोरीला गेलेली वस्तू राजाला परत मिळवून द्यावी लागते. तसे शक्य झाले नाही, तर तशीच दुसरी वस्तू वा तिचे मूल्य राजाला द्यावेच लागते.
२. गावांवरचा अधिकारी `गोप' असे. कोणाला परगावी जायचे असेल किंवा कोणाकडे बाहेरून कोणी येणार असेल, तर आधी गोपास वर्दी द्यावी लागे. प्रतिहार, पाल, पांडव आणि पेशवे यांच्या राज्यातील पोलीसयंत्रणेची वाखाणणी माऊंट, स्टुअर्ट, एलिफिनस्टन यांच्यासह अनेक विदेशी लेखकांनी केलेली आहे. ब्रिटीश शासनात रक्षकच भक्षक बनले.
३. व्यक्‍तीच्या संदर्भातील फौजदारी गुन्हे शासनाविरुद्धचे गुन्हे मानायला पश्चिमी संस्कृती तयार नाही. गुन्हा प्रत्यक्ष घडला, तरी गुन्हेगाराला न्यायालयासमोर खेचायचे कि नाही, हे सर्वस्वी फिर्यादीवर अवलंबून असते.
४. पाश्चात्त्य देशात जो तो आपापल्या पुरताच जबाबदार असतो. भारतीय राजनीतीत लोकांना परस्परांच्या मदतीकरिता धावून जाण्यास प्रवृत्त करणे, हे पोलिसांचे महत्त्वाचे कर्तव्य होते. मुसलमानी राजवटीतदेखील यावर भर होताच. ब्रिटिशांच्या कुटील राजनीतीने मात्र परस्पर सहकार्याची ही धारणाच छिन्न-भिन्न करून टाकली. परस्पर जातीजातीत द्वेष माजवला.'

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जून २००५)

Sunday, August 16, 2009

हिंदुस्थानची दुर्दशा का झाली ?


देशवासियांमध्ये राष्ट्राभिमान जोपासणे, तो सतत जागृत ठेवणे आणि तो वृद्धींगत करणे, हे राष्ट्ररक्षणाचे कार्य करू इच्छिणार्‍या प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्राभिमान जोपासण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांचे वैचारिक प्रबोधन करणे ! स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांमध्ये वैचारिक प्रबोधन करणारा प.पू. गुरूदेवांचा हा लेख प्रसिद्ध करत आहोत.





पूर्वीची नीतिमत्ता विसरलेले हिंदू !

`कर्नल एतार्ह्सी छातीला हात लावून सांगतो, ``हिंदु हा कधीच अब्रू, संपत्ती अथवा प्राणरक्षणाकरिताही खोटे बोलायचा नाही !'' गेल्या शतकाच्या पूर्वार्धातील ही स्थिती आहे. इ.स. १९४३ चा बंगालचा ऐतिहासिक दुष्काळ ! सहस्रश: लोक भुकेने तडफडून कलकत्त्याच्या फुटपाथावर मरून पडले. गोदामातील व अन्य ठिकाणचे धान्य लुटणे शक्य असूनही, त्यांनी तसा प्रयत्‍न केला नाही. समोरच्या दुकानांत धान्य होते. त्यांना दिसत होते; पण त्यांनी ते लुटले नाही कि दरोडे घातले नाहीत. महाराष्ट्रातील `दुर्गादेवी दुष्काळ !' या भयंकर दुष्काळातही लक्षावधी लोक मेले; पण कुणी लुटमार केली नाही. त्यांनी `धर्महानी' पत्करली नाही. धर्महानीला त्यांनी रतिमात्र वाव दिला नाही ! `कामनेने, भयाने, लोभाने नव्हे, तर प्राण गेला तरीदेखील धर्म सोडू नका !' (`न जातु कामान् न भयान् न लोभात् । धर्मं त्यजेत् जिवितस्यापि हेतो: ।') हे व्यासांचे धर्मसूत्र त्यांनी प्राणपणाने सांभाळले.
प्रत्येक हिंदूच्या अंतर्यामी अशा प्रकारची श्रद्धा आहे की, आपल्या कर्र्मौंामाणे आपल्याला सुख-दु:ख प्राप्‍त होते. आपल्या कर्माची फळे या जन्मात किंवा पुढच्या जन्मात भोगावी लागतात. कर्मफलाच्या धारणेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीपासून सहस्रश: वर्षे दूर राहू शकला. स्वातंत्र्याच्या काळापर्यंत ही कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा कायम होती. स्वातंत्र्यानंतर ती क्षीण होत गेली व आज ती जवळजवळ नष्ट झाली. नंतरच्या ५०-६० वर्षांत हिंदूंना त्याच्या सनातन धर्मापासून कोणी दूर केले ?'

१. हिंदू नीतीमत्ता विसरण्याचे कारण म्हणजे भोगलालसा
`आज क्षुद्र मोहाला बळी पडून हिंदु धर्मत्याग करू शकतो ? हे मोह कोणते ? याचा विचार केला, तर ते म्हणजे कृत्रिम भोगसाधने !
धर्मावरील श्रद्धा नष्ट झाल्यामुळे हिंदु समाज छिन्न-भिन्न झाला. तो ऐषारामी जीवनाकडे ओढला गेला. त्याकरिता भ्रष्टाचार ! आश्चर्याची बाब अशी, ज्या अमेरिकन लोकांना पुनर्जन्म व कर्मफल अमान्य आहे, तेदेखील सर्व प्रकारची मोहाची साधने आणि संधी उपलब्ध असतांनादेखील आजच्या सेक्युलर समाजापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात कमी भ्रष्टाचारी आहेत. भारतापेक्षा अमेरिकेत भ्रष्टाचार कमी असल्याचे आकडेवारी सिद्ध करते. केवढा चमत्कार!
जो हिंदु समाज धार्मिक आणि नीतीमान होता, तोच आज ऐषारामी जीवनाला चटावला आहे. आर्थिक साम्राज्य प्रस्थापित करू पहाणार्‍या कंपन्यांच्या आकर्षक जाहिरातींमुळे तो या ऐषारामी भोगसाधनांना बळी पडतो ! हप्‍त्याहप्‍त्याने सगळी भोगसाधने पुरवणार्‍या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडतो ! दिवसेंदिवस त्याची ऐषारामाची तहान वाढतेच आहे. अधिकाधिक भोगसाधने जवळ बाळगण्यात त्याला आनंद वाटतो. त्याच्या इच्छा वाढतात आणि तो कर्जाच्या जाळयात फसतो. अखेरीला भ्रष्टाचारी बनतो. हेच काही अध:पतनाचे एकमेव कारण नाही ! प्रश्‍न असा की, लक्षावधी वर्षांपासूनची आमची धर्मश्रद्धा; ज्या श्रद्धेने हिंदु समाजाचे रक्षण केले ती श्रद्धा, या पन्नास-साठ वर्षांच्या काळामध्ये नष्ट कशी झाली, याचा विचार केला का ?'

२. हिंदु शिक्षणप्रणाली बंद करून इंग्रजी शिक्षण सुरू करणारे धर्मद्रोही राजा राममोहन रॉय !
`राजा राममोहन यांना हिंदु धर्म भ्रष्ट व विकृत करण्याकरिता इंग्रजांकडून करोडो रुपये मिळाले. त्यांचे वडील वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते. संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची आई कृष्णभक्‍त आणि तेजस्वी पतिव्रता होती. दुपारी चार वाजेपर्यंत ती पोटात अन्नाचा कणही टाकत नसे. त्यांना तीन मुले होती. राममोहन थोरले होते. ते वडिलांकडून संस्कृत व धर्मशास्त्र शिकले. पुढच्या अध्ययनाकरिता काशीला गेले. तिथे पंडित झाले.
ते कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे संस्कृतबरोबर इंग्रजी व पर्शियन शिकले. हुशार असल्यामुळे ब्रिटीश गव्हर्नरपर्यंत त्यांचे जाणे येणे सुरू झाले.
त्या वेळेस ब्रिटीश शासनाने वेदपाठशाळा व संस्कृत यांच्या अध्ययनाकरिता बरीच मोठी रक्कम मंजूर केली होती. त्यानुसार हिंदूंची षड्दर्शने, वेदविद्या आणि संस्कृत वाड्मय शिकवण्याची सोय होणार होती. राममोहन यांनी गव्हर्नरला पुढील पत्र लिहिले - `...या वेदपाठशाळा, संस्कृत, हे सगळं बंद करा. हा सगळा पैसा तुमची पाश्चात्त्य शास्त्रे हिंदूंना शिकवण्याकरिता खर्च करा. युरोपातले प्राध्यापक आणा. ते आम्हाला विज्ञान, गणित वगैरे विषय शिकवतील. संस्कृत, वेदांत, न्यायशास्त्र ही पोपटपंची बंद करा !' ब्रिटीश शासन खुश झाले.
हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याची त्यांचीच योजना राममोहन यांनी उचलून धरली होती. राममोहन यांना हाताशी धरून ब्रिटिशांनी संस्कृतऐवजी इंग्रजी शिक्षण द्यायला प्रारंभ केले. त्या दुर्दैवी दिवसापासून हिंदूंच्या अध:पतनाला प्रारंभ झाला.'

३. इंग्रजी शिक्षणाचे दुष्परिणाम
`संस्कृत ही `देवभाषा', तर इंग्रजी ही `व्यापारीभाषा' आहे. इंग्रजी शिक्षण द्यायला प्रारंभ झाला त्या दिवसापासून आम्ही आत्मविस्मृतीच्या गहन अंधारात फेकले गेलो. संस्कृतची उपेक्षा आणि संस्कृतीविषयी तुच्छता निर्माण झाली. संस्कृतचे हिंदु पंडित आणि विद्यार्थी यांच्याकडे समाज तुच्छ दृष्टीने पाहू लागला. इंग्रजी, रसायनशास्त्र, विज्ञान, तंत्र यांचे शिक्षण घेणार्‍याला समाजात प्रतिष्ठा प्राप्‍त होऊ लागली. त्यांना नोकर्‍या मिळू लागल्या. त्याचा परिणाम असा झाला की, हिंदु समाजातला बुद्धीमान वर्ग संस्कृतपासून दूर गेला. संस्कृत पंडित हळूहळू युरोपियन प्रोफेसरांच्या रांगेत बसू लागले. हे हिंदू प्रोफेसर हिंदूंच्या सगळया अस्मिता तुच्छ करण्यात अभिमान बाळगू
लागले. `हिंदु समाजाने संस्कृत आणि प्राचीन शास्त्र यांसारख्या कालबाह्य गोष्टींपासून दूर रहावे', असे सांगू लागले.
त्यात त्यांना अभिमान वाटू लागला. (राजीव गांधी पंतप्रधान असतांना, त्यांनी भारतातून तर संस्कृतचे समूळ उच्चाटन केलेच; परंतु परदेशात कुठेही संस्कृत शिकविले जाऊ नये, म्हणून सर्वदूर प्रतिनिधी मंडळे पाठवली.)'

४. इंग्रजी शिक्षणाने पोसलेला बुद्धीवाद म्हणजेच इहवाद व ख्रिस्तीधर्म
हिंदूंच्या श्रद्धा निर्मूलन करण्याकरिताच या इंग्रजाळलेल्या हिंदू पंडितांनी चळवळी उभारल्या. या पृथ्वीवर सर्वाधिक श्रेष्ठ अशी ` ख्रिस्तीसंस्कृती' आणि ख्रिस्तीधर्म' आहे, असे चित्र ते रंगवू लागले. ``म्हणजे त्यांनी बुद्धीवाद पोसला!'', प्रा. मेहेर म्हणाले. गुरुदेव म्हणाले, ``बुद्धीवाद म्हणजेच इहवाद! तिथे फक्‍त `अर्थ' आणि `काम' हे दोनच पुरुषार्थ उरले. येथे कर्मफल व पुनर्जन्म यांची `शास्त्र-श्रद्धा' केव्हाच धुळीला मिळाली आहे. बुद्धीच्या (इंद्रियांच्या) कक्षेत जे येत नाही ते ते नाकारले गेले आहे.
म्हणजे हिंदूंच्या विधिनिषेधांना त्यांनी अंधश्रद्धा ठरवले ! या श्रद्धा घातक असल्याचे प्रतिपादले आणि हिंदु समाजाला अध:पाताकडे खेचले. इहवाद म्हणजे विज्ञाननिष्ठ बुद्धीवाद सांगून इंद्रियगम्य, बुद्धीगम्य असे निष्कर्ष काढून हिदूंची समाजरचना, ती मूलभूत तत्त्वे, दर्शनशास्त्रे, तत्त्वज्ञान जे आमच्या पूर्वज ऋषींना प्राप्‍त झाले होते, तो केवळ मूर्खपणा असल्याचे त्यांनी घोषित केले. वेद-वाड्मय ही रानटी लोकांची काव्ये आहेत, लोकगीते आहेत, असे निष्कर्ष त्यांनी काढले. अपौरुषेय, अनादी वेदवाड्मयाला, श्रुति-स्मृति-पुराणांना भाकड ठरविणारी शतश:
नव्हे, तर सहस्रश: पुस्तके त्यांनी लिहिली.'' ``पण हे हिंदू विद्यार्थी व पंडित यांनी मान्य तरी कसे केले ?'' डॉ. मेहेर म्हणाले.
गुरुदेव पुढे सांगू लागले, ``मॅकोलेची शिक्षणपद्धती अमलात आली होती. युरोपियन प्रोफेसरांनी त्यांची संस्कृती शिक्षणातून रुजविली. त्या संस्कृतीला प्रतिष्ठा आणि पैसा प्राप्‍त होत होता. इंग्रजी विद्येचा सन्मान होत होता!...''

५. हिंदु धर्म संस्कृतीला तुच्छ लेखणारे इंग्रजाळलेले पंडित !
`गुरुदेव पुढे गंभीरवाणीने सांगू लागले, ``आप्‍तवाक्य हा टवाळीचा विषय झाला. हे विष इंग्रजी शिकलेल्या हिंदूंच्या रक्‍तात भिनले आणि ते उत्तरोत्तर असे चढत गेले की त्यांना आपला धर्म आणि पूर्वज यांची लाज वाटू लागली. युरोपियन लोकांची थुंकी झेलण्यात ते अहमहमिकेने पुढे सरसावलेत. काहींनी हिंदु धर्म पूर्णपणे नाकारला ! थोडे विज्ञान विषयाचे समर्थन करू लागले. काहींनी धर्मात सुधारणा करण्याची अभिलाषा बाळगली. आणखी एक गंमत आहे. हे जे हिंदु धर्म संस्कृतीला तुच्छ लेखणारे इंग्रजाळलेले संस्कृत पंडित होते, त्यांना समाजात मान होता आणि ते श्रीमंत घराण्यातले होते, उदा. बंगालचे राममोहन, ईश्‍वरचंद्र विद्यासागर. महाराष्ट्रातही असे इंग्रजाळलेले पंडित होतेच. लोकहितवादी, भांडारकर, न्यायमूर्ती म.गो. रानडे, चंदावरकर असे प्रार्थना समाजवाले व आगरकरांसारखे धर्मसुधारक वगैरे.'

६. म्हणे निवृत्तीकडे वळल्यामुळे हिंदुस्थानची दुर्दशा झाली !
`शंकरांनी वेदांतातला मायावाद शिकवून म्हणे, हिंदु समाजाला मुर्दाड केले ! लोक निवृत्तीमार्गी झाले, उदासीन झाले, म्हणून परक्यांना फावले. आज आमच्या देशावर दुर्भाग्य कोसळले आहे ते का ? त्याची ही का कारणमीमांसा आहे ? हे इंग्रजी छायेचे लोक तसेच सांगतात. निवृत्तीकडे वळल्यामुळे हिंदुस्थानची अशी दुर्दशा झाली, असे कुणीच दाखवू शकत नाही ! तसा अभावानेही पुरावा नाही.'

७. गोर्‍यांचे पाय लागण्याआधीचा भारताचा ऐश्वर्यशाली इतिहास !
`अरे, हे गोरे पाय या भूमीला लागण्याआधी या भारताची सर्व प्रकारे भरभराट होत होती. भारत ऐश्वर्यवान होता. मग या इंग्रजांची घटोत्कची माया अवतरली आणि हे अंधाराचे दिवस आले. या गोर्‍यांचे पाय लागण्याआधी आमचा ऐश्वर्यशाली इतिहास पहा !.. इथे संपत्ती ऐश्वर्य होते.
सोन्याचा धूर होता. विद्या होत्या, व्यापार होता. परक्यांनी मत्सर करावा अशी अमाप संपत्ती, शौर्य होते. पराक्रम होता. युद्धाचा प्रसंग आला, तर लोक रणांगणावर मरायला तत्पर असत. रणांगणावर जायला ते घाबरले, असे कधी झालेच नाही.'

आता हिंदूदेखील इतिहासजमा होणार !
`गांधी-नेहरूंच्या या सेक्युलर, निधर्मीपणाच्या शासनप्रणालीत गोग्रास द्यायला गाय मिळणेही भाग्याचेच ठरणार आहे. आता वैदिक ब्राह्मणच काय; परंतु हिंदूदेखील इतिहास जमा व्हायचा बाका प्रसंग ओढावला आहे.'

(हिंदुस्थानची दुर्दशा का झाली ?, पृ. १०-११. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी)

`स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वधर्मसमभावी समाजवादी लोकशाही शासन आले आणि हिंदूंची सर्व बाजूंनी, सर्व क्षेत्रांत गळचेपी होऊ लागली. समाजवादी लोकशाहीने हिंदूंना नवा इतिहास शिकवला. तो असा की, हिंदूंना भूतकाळ नाही, वर्तमानकाळ नाही आणि भविष्यकाळही नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदु समाजाचा सनातनधर्म आणि संस्कृती, त्यांचे रितीरिवाज, परंपरा, शाश्वत असे वर्णधर्म, जातिधर्म, कुलधर्म, विवाहसंस्था, कुटुंबसंस्था या सर्वांवर बुलडोझर फिरवला गेला आहे. हिंदु-कोडबिल आणून महाभयंकर दुष्कृत्य केले गेले आहे.त्यांची गणना महापापातदेखील करता यायची नाही. हिंदूंचे वर्तमान आणि भविष्य यांनी छिन्न-भिन्न केले. त्यामुळे हिंदू संभ्रमावस्थेत आहे !, हिंदू कोण ? तेच आम्हाला कळेनासे झाले आहे. इंग्रजी शिक्षणात वाढलेल्या हिंदूंना `हिंदू' म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली. हिंदु, जैन, शिख, बौद्ध, लिंगायत, पारशी असे वेगळे पंथ स्वीकारून त्यांच्याकरिता खास सवलती जाहीर केल्या. या लाकशाहीने मताच्या लाचारीकरिता पुरलेले मुडदे उकरून काढले.
(हिंदू कोण ?, पृ. ४-५. प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ)


Friday, August 7, 2009

सनातन हिंदु धर्म!


कर्म केले की कर्मफल मिळणारच. कर्म फलापासून सुटका नाही. कर्माचे प्रारब्ध, संचित व क्रियमाण असे अत्यंत शास्त्रीय भेद श्रुतीतून आलेले आहेत.ही प्रमेये निरपवाद शास्त्रीय असून शाश्‍वत सत्ये आहेत, याविषयी तिळमात्र शंका, ज्याच्या डोक्यात मेंदू आहे, त्याला येणार नाही.

ज्या, क्रियेने परमेश्‍वरठायी नितांत भक्ती उत्पन्न होते, ती क्रिया म्हणजे धर्म. परमेश्‍वराच्या ठायी भक्ती लागून आत्मा प्रसन्न होणे हे त्या क्रियेचे फळ आहे. प्रसन्न बुध्दीचे फळ दु:ख नाश आणि तेच प्राणीमात्रांचे ध्येय आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे.


धर्म हाच ईश्‍वरी न्याय आहे. धर्मानेच सृष्टिनियंत्रण होते. धर्म इंद्रियनिग्रह शिकवतो. इंद्रिय निग्रह प्रत्येक व्यक्तीला सद्‍गुणी बनविण्याला समर्थ आहे.
पापपुण्य, सुकृति-दुष्कृति अशा व्यक्तींचा व समाजाचा उत्कर्ष व अपकर्ष करणार्‍या क्रियांचा विचार धर्मात येतो. इहलोकी धर्म रक्षण करतो. परलोकी तो साहाय्यभूत होतो. धर्म शब्दात अंतर्भूत असलेल्या तत्वांचे दिग्दर्शन religion , sacred law , duty ,sacred duty monestrial life , private life अशा कोणत्याही शब्दाने होणार नाही. तसा अनुवाद करणे म्हणजे मानव समाजाला नरकगामी करणे आहे.

आवाहन!

श्र्व वृत्ती


गौरीशंकराची प्रज्ञा summit wisdom असलेला मनु सांगतो, "ब्राम्हण्य जर ब्राम्हण जिवीकीने राखता येत नसेल तर क्षत्रियाचा व्यवसाय करावा. ते ही शक्य नसेल तर वैश्याचा व्यवसाय करावा, शेती-गोपालनादि व्यवसाय करावा. परंतु नोकरी 'सेवा' कदापी करू नये. 'न श्र्व वृत्त्या कदाचन' कुत्र्याच्या वृत्तीने जगू नये.
अब्राहम लिंकन नेमकं हेच सांगतो , "In slavery man loses everything , even desire to be free."

शासनकर्त्यांनो!, नोबेल पारितोषिकाच्या तोलाचे एक मोठे संस्कृत पारितोषिक ठेवा. भारतेतर देशातील लोक जर त्यांच्या ग्रंथाचा संस्कृत अनुवाद सादर करतील तर ते देखिल नोबेल पारितोषिकाला पत्र ठरतील."

Saturday, August 1, 2009

श्राद्ध म्हणजे काय?


"पुराणात पितरांची दोन प्रकारांनी उत्पत्ती दिलेली आहे. साक्षात् ब्रम्हदेवापासून जे पितृगण उत्पन्न झालेत , ते प्रथम कोटीत येतात. ब्रम्हदेवाने जे कश्यप , अत्रि , वगैरे... सप्तर्षीनिर्माण केलेत , त्यांच्यापासून उत्पन्न झालेले पितर हेदुसर्या कोटीत येतात. "
"श्रद्धापूर्वक उत्तमोत्तम अन्नाचे ब्राह्मणांना भोजनविधीपूर्वक देणे हेच श्राद्ध आहे."



मरीचि ऋषी सांगतात, " प्रेत म्हणजे ज्यांचे सपिण्डिकरण श्राध्द अजून झाले नाही, ते अणि त्यांचे पितर ज्यांचे सपिण्डीकरण श्राध्द झालेले अहे. त्यांना निमित्त करून आपणाला प्रिय असे उत्तम भोजन श्रध्दापूर्वक दिले जाते. त्यालाच श्राध्द म्हणतात. याचा अर्थ मृत व्यक्तीला निमित्त करून ब्राह्मणभोजन देणे हेच श्राध्द आहे.

" नृसिंह पुराण सांगते की , "दिव्यपितर , देवता , आपले पितर , ऋषी मनुष्ये यांचे हव्य कव्याने श्राध्द करावे .यज्ञात अग्नीकुंडात हवन करण्याने देवतांना, ब्राम्हण भोजनाने पितरांना ह्व्य कव्य प्राप्त होते. नरकस्थित पितरांचा उध्दार जमिनीवर तीन पिण्डाचे दान करण्याने होतो."
" मृत पित्याचे श्राध्द, मुलांनी प्रयत्नपूर्वक करायलाच हवे. पिण्डदान समयी विधिवत श्राध्दकर्त्याचा संबंध, त्यांचे नाम त्याचे गोत्र हे सगळे स्पष्ट उच्चारून सांगायचे आहे. नाम गोत्राचे उच्चारण करण्यानेच त्यांना हव्य कव्य वगैरे प्राप्त होते."
"ज्यांना मुलगा नाही असे मृत स्री पुरूष असतील तर त्यांच्याकरता एकोद्दिष्ट श्राध्द करायचे अहे. त्यांचे पार्वण श्राध्द होत नही."
श्राध्दकर्मात पिता पितामह वगैरेंना देवता मानण्यात येत नही. पिता, पितामह, प्रपितामह पदांनी वसु, रूद्र, आदित्य या पदांचे ग्रहण केले जाते."

मनुस्मृतीचे वचन आहे,
वसून्वदन्ति तु पितृन् रुद्रांश्वैव पितामहान् ।
प्रपितामहांस्तथादित्यान् श्रुतिरेषा सनातनी ॥ ३.२८४
(बाप वसुरूपाने, आजा रुद्ररुपाने, पणजा आदित्यरूपाने पूजनीय असतो. असे सनातन वेदवचन आहे. वसुगण पिता, रूद्रगण पितामह, आदित्यगण प्रपिता म्हटले जातात. ही परंपरा सनातन काळापासून सुरू आहे.")

याज्ञवाल्क्य स्मृति सांगते,
"वसुरूद्रादिसुता: पितर: श्राध्द देवता ।
प्रीणयान्ति मनुष्याणां पितॄन श्राध्देन तर्पित:||"
(वसुरूप आदित्य हे तीन वर्गातले पितृगण. हेच श्राध्दांचे देवता अहेत. श्राध्दात हे तृप्त झालेत की ते करणार्याच्या पितरांनाही तृप्त करतात. या प्रकारे जो विद्वन पुरूष पितरांचे श्राध्द करतो, त्यामुळे वसु रुद्र आदित्य हे देवगण प्रसन्न होतात.")

मोघतिथी आणि गोविंदराज या मनुस्मृतीवरच्या श्रेष्ठ भाष्यकारांनी या श्राध्द प्रकरणावर भाष्य करतांना लिहिले आहे की, जे कुणी आपल्या वाडवडिलांचा म्हणजे पिता वगैरे पितरांचा द्वेष करतात अथवा जे नास्तिक आहेत, असे जे श्राध्द करीत नाहीत, त्यांना श्राध्दकर्मात प्रवृत्त करण्याकरता पितरावर देवत्वाचा आरोप केला आहे आणि त्यांची प्रशंसा करणे, हा या वाक्याचा अभिप्राय आहे.

मिताक्षरा सांगतो, " श्राध्दकर्मात पिता, पितामह, प्रपितामह, प्रभृति शब्दांतील ते मृत केवळ कव्य स्वीकारण्याचे अधिकारी नाहीत तर त्यांचे अधिष्ठान अशा वसु, रुद्र, आदित्य देवतांसह ते कव्य ग्रहणाचे अधिकारी होतात. सार हे की, वसु, रुद्र, आदित्य, गण प्रभृति, अधिष्ठानभूत देवता, पितर श्राध्दांत तृप्त होतात. "ब्राह्मणांना दिलेल्या अन्नाने तृप्त होऊन त्यांचे पिता, पितामह अशांना ते देव तृप्त करतात. या पुण्यकर्माचे फल प्रदान करतात. "

विष्णुपुराणांत प्रथम कोटीच्या पितरांचे वर्णन आहे . " यानंतर ब्रम्हदेवाने अंशभूत असे सत्वगुणमय अन्य शरीर धारण केले जे ब्रम्हदेवाला पिता मानतात, त्यांना पितृगण म्हणून प्रस्थापित केले. पितृगण रचना होताच ब्रम्हदेवाने ते सत्वगुणमय शरीर टाकलं . "

"वराहपुराण सांगते , परमेष्ठी ब्रम्हदेव आत्मसमाधीत स्थित होते. तेंव्हा त्यांच्या शरीरातून धूम्र वर्णाची कांतिमान तन्मात्रा प्रगटली . त्यांनी तपस्व्यांचे रूप धारण केले आणि अंतराळात स्थित होऊन आंम्ही क्षुधेने पिडीत आहोत . आंम्ही काय खावे ? काय प्यावे ?"
तेंव्हा ब्रम्हांडाचे पितामह ब्रम्हदेव म्हणाले , " तुम्ही सर्व गृहस्थांचे पिता व्हा. "

वायुपुराण सांगते ,"ऋत हे अग्नीचे नांव यालाच संवत्सर म्हणतात. या ऋत अग्नीपासून ऋत निर्माण होते. आणि ऋतपासून आर्तव नावाचे पितर होतात. ऋत हा पितामह मास (महिना) याचा प्रतिनीधी आहे. आर्तव यांचे पुत्र अहेत. यांनाच प्रपितामह म्हणतात . ब्रम्हदेवापासूनच हे आर्तव वर्षाचे पितर उत्पन्न होतात. संवत्सर प्रजापती अग्नी वा ऋत म्हटला जातो. ऋतुपासून सर्व जगताची सृष्टी झाली.

ब्रृहस्पती सांगतात , " दूध , दही , तूप , मध अशी सहा मिष्टान्ने पक्वान्ने करून श्रध्दापूर्वक विधीनुसार ब्राम्हण भोजन द्यायचे, हेच श्राध्द आहे. "

ब्रम्हपुराण सांगते , " योग्य, देश, काल, उत्तम ब्राम्हण इतके असल्याने श्रध्दापूर्वक विधिविधानाने पितरानिमित्त ब्राम्हण भोजन घालणे, हेच श्राध्द आहे ."

श्राद्धात केवळ पितरच नाही, तर इतर देवदेखील असणे

`श्राद्धविधीत पितर असतात, तसेच विश्वेदेव असतात. श्राद्धात आधी विश्वेदेवाचे पूजन, संभावना वगैरे वगैरे विधी-विधाने होतात. एक ब्राह्मण पूर्वेकडे तोंड करून बसतो, तो विश्वेदेव दुसरा उत्तरेकडे तोंड करून बसतो, तो पितररूपात असतो. वसु, रुद्र आदित्य हे काही पितरांतच नसतात, तर देवातही असतात. डोळयाने प्रत्यक्ष दिसणारा `सूर्य' हा यज्ञत्रिक्रियेने निर्माण झाला. त्याच्या रोहित शुक्ल-कृष्ण स्वरूपाचे वसु, रुद्र आदित्य यांना दर्शन घडते. अमृताचा लाभ होतो. या देवता प्रत्यक्ष अन्नसेवन वा जलपान करत नाहीत, तर वसु, रुद्र आदित्य या देवता इंद्र, अग्नि, वरुण या देवतांच्या मध्यस्थीने अमृतसेवन करतात.'
(संदर्भ : गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाड्मय पत्रिका `घनगर्जित')


पुनर्जन्म का मानावा ?

कारणे
अ. कृर्तैंाणाश : `आपण जी कर्मे करतो, त्यांचे सुख-दु:खात्मक फल आपणाला प्रप्‍त होते. पुनर्जन्म न मानला, तर केलेल्या कर्माची फलप्राप्ती न होताच विनाश होईल. म्हणजे इथे `कृर्तैंाणाश' आहे. पुनर्जन्म न मानला, तर या जीवनात माणसाने जी जी सत्कर्मे वा दुष्कर्मे केलीत, त्यातील जी याच जन्मात फलद्रूप होत नाहीत, ती वाया गेलीत असे होईल, हाच कृर्तैंाणाश !
आ. अकृताभ्यागम : काही माणसे श्रीमंत, निरोगी, बुद्धीमान असे जन्माला येतात, याचे कारण काय ? तसेच काही माणसे जन्मत:च दरिद्री असतात; पंगू, आंधळे, मुके व रोगी असतात; हीन जातीत जन्म घेतात. ही जी दु:स्थिती जन्मत:च प्रप्‍त झाली, याला कारण काय ?
पुनर्जन्म न मानला, तर दुष्कर्म वा सत्कर्म यावाचून ती स्थिती प्रप्‍त झाली, असे होईल. यालाच `अकृताभ्यागम' म्हणतात.

मृत्यूनंतरची गती
१. ख्रिश्चन , इस्लाम, यहुदी : हे ईश्‍वर मानतात, पुनर्जन्म मानीत नाहीत. त्यांचा जीवात्मा मृत्यूनंतर देवदुताच्या निवाडयाप्रमाणे कायमचा स्वर्ग वा नरक यांतच रहातो. त्याला कर्मभोग संपवण्याचा कोणताच मार्ग नाही.
२. हिंदु धर्म : जीवात्मा हा मृत्यूनंतर देवलोकी वा यमलोकी जातो.
अ. मृत्यूनंतर देवयान मार्गाने ज्ञानी व तपस्वी ब्रह्मलोकात जातात.
आ. पुण्यवान लोक पितृयानमार्गाने परलोकी स्वर्गात जातात, पुण्य भोगून पुन्हा मृत्यूलोकात येतात.
इ. पापी इथेच नाना नीच योनीत जन्म घेऊन भटकतात.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन)

Saturday, July 25, 2009

नागपंचमी

नाग भगवंताच्या अवतार कार्याशीही निगडित आहे. जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजतो त्यामुळे देवाच्या भक्तांना दुर्जनांकडून जाच होतो त्यांच्या ईश्वरोपासनेत बाधा निर्माण होते, तेव्हा ईश्वर अवतार घेऊन दुर्जनांचा नाश करतो आणि धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. धर्माची स्थापना करून तो हजारो वर्षांसाठी हा भूलोक साधनेसाठी अनुकूल बनवतो. निर्गुण परंतु सर्वशक्तीमान असा ईश्वर कोणत्या तरी रूपात प्रत्यक्ष प्रकट होऊन कार्य करतो, तेव्हा त्या कार्यासाठी `त्याचे सेवक' या नात्याने अन्य देवता वेगवेगळी रूपे धारण करतात या धर्माच्या कार्यात भाग घेतात.


शेषनागाचे
स्थान या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्रेतायुग द्वापारयुग यांच्या संधीकाळी श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापारयुग कलीयुग यांच्या संधीकाळात श्रीकृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेषनाग बलराम झाला.

नागाचे देवत्व सांगतांना गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे, ```नागांतील श्रेष्ठ जो `अनंत' तोच मी !'' `नागातील श्रेष्ठ जो `अनंत' तोच मी', अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो. अनंत वासुकिं शेषं पद्मनाभंच कंबलं। शंखपालं धृतराष्ट्रे तक्षकं, कलियं तथा ।। अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपात्र, धृतराष्ट्र, तक्षक कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात, म्हणजे सर्पभय उरत नाही, विषबाधा होत नाही.'

अनंत वासुकिं शेषं पद्मनाभंच कंबलं।
शंखपालं धृतराष्ट्रे तक्षकं, कलियं तथा ।।
(अर्थ : अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपात्र, धृतराष्ट्र, तक्षक कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात, म्हणजे सर्पभय उरत नाही, विषबाधा होत नाही.')
- .पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका `घनगर्जित', वर्ष दुसरे, अंक .

Thursday, July 16, 2009

डार्विनचा उत्क्रांतीवाद कालबाह्य आहे.


  • ज्ञान अणि क्रिया शक्ती अशाच क्रमाक्रमाने उत्क्रांत होत गेल्या. ही शुद्ध थाप आहे, मधमाशी किती युगापासून मध तयार करणे जाणते आणि करते? नाना प्रकारच्या फुलांतला कडु, आंबट, तिक्त, तुरट, खारट, अशा अनेक रसांतून केवळ मधुर रसच ती घेते. त्या मधुर रसांचा संग्रह करते. केवढा चमत्कार आहे हा!
  • मृतात्म्याच्या दहाव्या दिवशी दिलेल्या पिंडाभोवतीची ती प्रेतछाया, त्या कावळ्यालाच केवळ दिसते. म्हणून तर तो त्याला स्पर्श करीत नाही.
  • पशू , पक्षी, तसेच मानव या पृथ्वीवर प्रगटले, तेव्हापासून त्याच्या बाह्य वा आंतर इंद्रियात अशा विचित्र, अदभूत शक्ती आहेत की ती क्षमता आजच्या अत्याधुनिक विज्ञानालाही शक्य नाही. अशी कोणती विज्ञानाने निर्मिलेली यंत्रे ही किमया घडवू शकतात?
  • वायु व जलाचा प्रभाव प्रत्येक इंद्रियावर कसा होतो? तोंडातून अन्न व जल जठरात जाते. जठराग्नी ते पचवितो. नानाविध रस तयार होतात. वात, पित्त, कफ त्या अन्न व जलापासून तयार होते. रक्त, मज्जा, मांस, मेद, केस आदि सप्त धातु तयार होतात. ते का विज्ञानाला निर्माण करता येतील ? इथे कोणता विकासाचा क्रम आजच्या उत्क्रांतिवाद्याला सांगता येईल?
  • अन्नापासून निर्माण होणार्‍या मन आणि यासारख्या सूक्ष्मातिसूक्ष्म वस्तू विज्ञान निर्माण करू शकते का?
  • नदी वा सागर तीरावरच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म वाळूकणातून नेमका साखरेचा सूक्ष्म कण ती मुंगी नेमका हुडकून काढते. कस शक्य होते ते तिला?
  • गवत, दूर्वा आदि चारा गाईच्या पोटात जाऊन त्याचे रूपान्तर या स्तनातून येणार्‍या दूधात कसे होते? गवत, तृणापासून दूध निर्माण करणारी प्रयोगशाळा विज्ञानाला निर्मिता येईल का?
  • स्त्रीयोनीत पडलेल्या वीर्यकणाचा स्त्रीगर्भात मानव होतो, पशु होतो. केवढा चमत्कार आहे हा!
  • नाना रसांना वाहून नेणारया नाडया तसेच नेत्र, कर्ण, नासिक (नाक) यांच्या शक्ती, विज्ञान निर्माण करू शकते का?
  • कशी अदभूतता आहे ही! सर्व शक्तिमान, सर्वज्ञ परमेश्वराच्या अस्तित्त्वाचा हा पुरावा नाही का? हा का आकस्मित विकास आहे? का आपोआप घडलेली उत्क्रांति आहे?
  • ज्याचा मेंदू सडला आहे असा पामर असं कांही तरी बरळणे शक्य आहे.

Wednesday, July 8, 2009

शिक्षणासाठी इंग्रजीचे माध्यम पाहिजे, ही दुबळी मनोवृत्तीच राष्ट्राच्या उन्नतीला मारक !


आज `पहिलीपासून इंग्रजी शिकवावे', असे शासनाचे धोरण आहे. म्हणजे इतर विषयापेक्षा इंग्रजी सर्वाधिक महत्त्वाची. `इतर विषय बाद झाले, तरी चालतील; परंतु इंग्रजी पहिल्यापासून शिकवलेच पाहिजे', असे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. हा हटवाद असून शिक्षणाचा खेळखंडोबा आहे. तो विद्यार्थ्यांत न्यूनगंड जोपासणारा आहे. शासन सांगते की, पहिल्या वर्गापासून इंग्रजी न शिकवले, तर बहुजन समाजाला इंग्रजीच येणार नाही. अशी जी शासनाची भूमिका आहे, ती इंग्रजीची दहशत आहे, प्रभाव आहे; म्हणून न्यूनगंड आहे. मातृभाषा मराठीच येत नाही. तिथे इंग्रजी कशी येईल ? शासनाचे पहिलीपासूनचे इंग्रजीचे धोरण हे अत्यंत अविवेकी व आत्मघातकी आहे.

आज महाराष्ट्रात मराठीची अवस्था
रस्त्यावरून जातांना ठेच लागली, तर `आई गं' असे कळवळणारा मराठी माणूस आज कुठे आहे ? तो `ओ-द-हेल' असे किंचाळतो. जरा कुठे आश्चर्य वाटले तर `माय गॉड' म्हणतो. कंडक्टर `वन हाफ टू फुल' सांगतो. फळे विकणारा भाजीवाला म्हणतो, ``साहेब आता `बिझनेस' उरला नाही.'' आमच्या लग्नात, समारंभात महाशिवरात्रीलादेखील टेबल डिनर, तंदुरी डिनर, कँडल डिनर, डेझर्ट डिनर यांना प्राधान्य आले. आमचे सण, महाशिवरात्रीसारखे उपवासदेखील इंग्रजी पद्धतीने साजरे होतात. महाशिवरात्रीचा उपवास ! कुठे गेले ते श्रीखंड, राजगिर्‍याची पुरी, बटाटा पुरी, साबुदाणा वडा ? आम्ही आता महाशिवरात्रही विसरलो.

प्रादेशिक भाषांनी इंग्रजी मॉडेलचे अनुसरण केले व संस्कृत ही मृतभाषा म्हणून आम्ही हद्दपार केली. जगातील अन्य राष्ट्रांतून संस्कृत शिकवण्याला बंदी आणावी, असे प्रयत्‍न झाले. मग इंग्रजी बोकांडी बसली. इंग्रजी माध्यम आले. तुलनात्मक भाषाशास्त्रांचे अध्ययन करून इंग्रजीतून जो आपले विचार मांडू शकतो, तो आमचा मार्गदर्शक झाला. त्याचे विचार आम्हाला प्रमाण वाटू लागले.

केंद्र व राज्य यांतील कॅबिनेट मंत्री, संसद सदस्य असे असंख्य लोकप्रतिनिधी इंग्रजीचा गंधही नसणारे होते. या असंस्कृत, अडाणी, निरक्षरांना त्यांच्या भामटेपणा, दादागिरी, मस्तवालपणा, भयंकर भ्रष्टाचार, दंडुकेशाही अशा स्वरूपात आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. भारताची लोकशाही ही आंधळी कोशिंबीर आहे. तो एक महा विनोदाचा नमुना आहे.

इथे बुद्धी, मेंदू व मस्तक यांना काडीइतकेही मूल्य नसून गुन्हेगार व गुंड यांना महत्त्व आहे. आज भारत बुडतो आहे ! बुडाला आहे ! ठार बुडाला आहे ! हे सगळे जे नरकपतन झाले, ते आम्ही इंग्रजी भाषा, पाश्चात्त्य संस्कृती आणि जीवनरहाटी यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करली, त्याचा हा परिणाम आहे.'

कालचे व आजचे साहित्य

`आधुनिक साहित्यात बोलण्यात व भाषेत अश्लीलतेला, शिवराळपणाला प्रतिष्ठा प्राप्‍त झाली आहे. प्राचीन लोकव्यवहारात शिवराळपणा अप्रतिष्ठित, अधम मानला जायचा. अचकट-विचकट बोलणे खालच्या समाजात असले, तरी ते हीन मानले जायचे.'

संतांनी मुसलमानी अंमलात मराठीत ग्रंथ लिहिले. त्या मराठीचे स्वरूप अत्यंत सोज्वळ व संस्कृतनिष्ठ आहे. मराठी संतांनी महाराष्ट्रीय समाजासाठी किंबहुना अखिल समाजासाठी नानाविध उपक्रम केले. त्यातून मराठीचे सोज्वळ स्वरूप कायम राहिले. त्या काळी शासनाचे कोणतेही प्रोत्साहन नसतांना, उलट विरोध असतांना या महापुरुषांनी मराठी भाषा ग्रंथरचनेत समृद्ध व वैभवशाली केली. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. म्हणूनच मराठी माणसांत आपली मातृभाषा व संस्कृती यांसंबधी ज्वलंत अस्मिता कायम राहिली.

व्याकरणाचे महत्त्व

गुरुदेव :
महाराष्ट्रात मराठी व्याकरण व व्याकरणशास्त्राचा अभ्यास करणारे किती आहेत ?
राजे : एकही नाही.
गुरुदेव : व्याकरणाविना वाणी शुद्ध व पवित्र कशी होईल ? मग भाषेचा उपयोग काय ? ओंगळ, बिभत्स भाषा माणसाला ओंगळच करील.

`बाल्यावस्थेत संस्कृतचे रसायन तुमच्या रक्तात मिसळले गेले, म्हणजेच संस्कृतची मूलतत्त्वे लहानपणी तुमच्या विचारशक्तीत भिनवली गेली, तर जगातील कोणत्याही भाषेला कोणत्याही वयात तुम्ही पुष्कळशा कमी श्रमात अवगत करू शकता', असे भाषाशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे. तिच्या पायावर एखाद-दुसरा इंग्रजीचा माळा चढवला, तर त्या घराला विकलांगता आणि विरूपता येत नाही. ते घर आनंदी असते; पण पहिलीपासून इंग्रजीतूनच शिक्षण घ्यायला लावले की, घराला पाया नसलेल्या पत्त्यांच्या `बंगल्या'ची अवस्था येते. घरातले आणि बाहेरचे वातावरण मराठी असते; पण त्याकडे चक्क डोळेझाक करून इंग्रजीतूनच जगाशी संवाद साधण्याची सवय लावली जाते. त्याचा परिणाम मातीत पाळेमुळे रुजवण्यावर विपरीतपणे होतो. मराठी शिकायला बंदी असते आणि इंग्रजी शिकतांना धाप लागते. मुलाला कसलीच नातीगोती जोडता येत नाहीत. तो पोरका होतो. उद्ध्वस्त होतो. स्वार्थी होतो.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Saturday, July 4, 2009

चौसष्ट कला
भारतीय संस्कृतीत ज्या चौसष्ट कलांचा उल्लेख आला आहे त्या अशा...

१. गीत१७. पुष्प-कर्ण फूले रचना३३. नजरबंदी४९. शृंगारसाजाची रचना
२. वाद्य१८. जल अटकाव रचना३४. कोटीबाजपणा५०. तौलनिक भाषा विज्ञान
३. नृत्य १९. पेये तयार करणे३५. सुतारकाम५१. झुंज लावण्याचे कसब
४. नाटय २०. पडदे तयार करणे३६. बांधकाम५२. पोपट-मैना इत्यांदिस बोलावयास शिकवणे
५. आलेख-रेखाकर्म २१. सुगंधी द्रव्ये बनविणे३७. रत्नपरीक्षा५३. देशभाषेचे सांगोपांग ज्ञान
६. गोंदणे २२. वीणावादन३८. धातुपरीक्षा५४. वेगवेगळे गंध तयार करणे
७. फुलोरा रचणे
२३. कोडी, उखाणे सोडविणे३९. वृक्षपरीक्षा५५. तौलनिक भाषा विज्ञान
८. पुष्पशेज रचना२४. मूर्तिकला४०. खाणीची परीक्षा५६. उत्साहित करण्याचे कसब
९. मेंदी रचना२५. ठकविद्या४१. हातचलाखी५७. चेटूक करणे
१०. रत्नजड़विणे २६. वाचन४२. हरहुन्नर कसब५८. रंगीत रत्ने तयार करणे
११. जिन्नस -रचना२७. ऐतिहासिक देखावे बनविणे४३. वशीकरण५९. वस्त्रे तयार करणे
१२. जलतरंग२८. समस्यापूर्ती४४. पगडबंदी६०. बहुरूप्याचे कसब
१३. चित्रकला२९. बोथाटी, दांडपट्टा खेळणे४५. केशरचना६१. छंद रचनाज्ञान
१४. पुष्पहार रचना३०. बागकाम करणे४६. पाक कौशल्य६२. इंद्रजाल
१५. कशीदा काम३१. मंत्र-तंत्र-यंत्र विज्ञान४७. फासे खेळणे कसब६३. मुलांचे खेळ
१६. भरत काम३२. काव्यकल्पना ४८. मुठीतील गुपित ओळखणे ६४. जारणमारण


ब्रम्ह -
१. शब्द ब्रम्ह २. अक्षरब्रम्ह ३. खं ४. सर्व ५. चैतन्य ६. सत्ता ७. साक्षित्व ८. सगुण ९. निर्गुण १०. वाच्य ११. अनुभव १२. आनंद १३. तदाकार १४. अनिर्वाच्य

भक्तिआचार्य -
१. नारद २. प्रह्ललाद ३. पराशर ४. पुंडलिक ५ व्यास ६.अंबरिष ७.शुक ८. शौनक ९. भीष्म १०. दाल्भ्य ११. रौंख्मांगद १२. अर्जुन १३. वसिष्ठ १४. बिभीषण

मनू -
१. स्वायंभू २. स्वरोचित ३. औत्तमि ४. तामस ५. श्वैत ६. चाक्षुस ७. वैवस्वत ८. सावर्णी ९. दाक्षसावर्णी १०. ब्रह्मसावर्णी ११. धर्मंसावर्णी १२. रुद्रसावर्णी १३. शौचसावर्णी १४. इंद्रसावर्णी

विद्या -
१. ब्रम्हज्ञान 2. रसायन ३. श्रुतिकथा ४. वैद्यक ५. ज्योतिष ६. व्याकरण ७. धनु विद्या ८. संगीत ९. आश्वारोहण १०. पय:संचार ११. नाटक १२. चोरी १३. कोक १४. पटुत्व

मंथन -
१. लक्ष्मी २. कौस्तुभ ३. पारिजातक ४. मदिरा ५. धन्वंतरी ६. चंद्रमा ७. कामधेनू ८. अप्सरा ९.ऐरावत १०. उच्चै:श्रवा ११. अंकुश १२. वीष १३.शंख १४. अमृत

Sunday, June 28, 2009

वनस्पतींचा र्‍हास व धर्मशास्त्रनिष्ठेच्या संदर्भात सामाजिक स्पंदनाभिमुखतेची आवश्यकता !


गुरुदेव आश्रम साक्षेपाने सनातन हिंदुधर्माच्या संदर्भातल्या शास्त्रनिष्ठेचे जतन करण्याकरता एकनिष्ठेने अखंड यत्न करीत राहील. शास्त्रनिष्ठेच्या संदर्भात सामाजिक स्पंदनाभिमुखता असेल .




  • आयुर्वेदीय उद्याने काही राज्यात क्वचित असतीलही प्रत्येक राज्यात का नसावीत?
  • हिंदूच्या धर्मशास्त्राची आज्ञा आहे. जिवंत वृक्ष तोडू नये. वृक्षांच्या बुंध्याशी पाट बांधावेत.
  • वराह पुराण सांगते, जोपर्यंत या भूतलावर पर्वत, सरोवर, वने, आहेत. तोपर्यंतच तुम्ही, तुमची मुले
  • आणि भावी पिढया सुखाने जगतील !
  • घरा समोर कोणते वृक्ष असावेत ? देवलासमोर कोणते वृक्ष असावेत ? पिंपळ, आवळी, आंबा, औदुंबर, बिल्व, वृक्ष कोठे असावेत ? शाळेत विशेषतः मुलींच्या शाळेत अश्वथ वृक्ष असलाच पाहिजे. शाळेच्या प्रार्थनेच्या पूर्वी मुलींनी अश्वथ पूजन, प्रदक्षिणा केलीच पाहिजे. पिंपळपूजन, नमस्कार, प्रदक्षिणा ही स्त्रियांना आवश्यक असल्याचे धर्मशास्त्र सांगते. महाविद्यालयात कोणते वृक्ष असावेत ? रुग्णालयात, विद्यापीठात, खेडयात, उपनगरात, महानगरात, राजधानीत, रस्त्यावर, महापथावर कोणते वृक्ष लावावेत. याचा विचार अजूनही आम्हाला सुचू नये? सेक्युलर शासनाला वृक्षाची घृणा तर नाही ना?
  • वसिष्ठ मुनींनी वनवासाला जातांना रामप्रभूला दवणा दिला होता. हरितालिकेला रुईचे पान चाटून उपवास केला तर रक्त शुद्धी होते. एखाद्याच्या अनेक बायका मेल्या तर मध्ये एक लग्न रुईशी लावून मग पुढचे लग्न लावले असता नवर्‍याचा रक्तदोष बायकोला बाधत नाही.
  • वनस्पतीत सत्व गुण प्रभावी असतो. सत्वाचे संवर्धन करणारा जो प्रभाव आहे, त्यामुळे मनाचे रज, तम हे जे रोगाचे कारण आहे, ते दूर करणे व मनाला स्थिरता व प्रसन्नता देतो. हे वनस्पतीचे परम मोलाचे व मानवकल्याणाचे सर्वाधिक मोठे असे कार्य आहे.
  • शिवमंदिरे आहेत पण तिथे बिल्ववृक्षच नाही. गणेशमंदिरे आहेत पण मंदार ,शमी वृक्ष नाही. विष्णु मंदिरे आहेत, पण तिथे तुळशीचे वन नाहीत. मंदिरासभोवती अश्वथ, आवळी, औदुंबर, वटशा वृक्षांचा पूर्ण अभाव का? वनस्पती या आमच्या धर्मजीवनाचा घटक आहेत. गीतेत भगवान सांगता, 'उपद्रष्टा, अनुमंता च कर्ता भोक्ता महेश्वरः ! - १३/२२'
  • वनस्पती या भगवंताच्या साक्षीभावाच्या साक्षात मूर्ती आहेत, ही जाणीव जागवा आणि पहा काय चमत्कार घडतो तो !

देव आहे का ?


It is the mark of an in-experienced man not to believe in God. - Joseph Conrad.

या स्थावरजंगमात्मक संपूर्ण जगाचे उत्पत्ति, स्थिती, लय सूर्यापासून होतात. हा स्वयंप्रकाश आहे. सूर्यापासून प्रकाश व उष्णता सर्वांना मिळतात. त्याच्या प्रेरणेने आम्हांला कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती होते. सूर्य आहे म्हणून जगाचे सर्व व्यवहार सुव्यवस्थित चालत आहेत. तो सूर्यच साक्षात देव आहे. त्या सूर्यालाच मी अनन्य भावाने शरण आहे. आत्मा हाच सूर्य आहे.

हा आत्मरूप सूर्य चैतन्यरूपाने शरीरात राहून कर्मेंद्रिय , ज्ञानेंद्रिय,

प्राण , मन, बुध्दि यांना प्रकाशित करतो. आकाशातला सूर्य शरीरातील
चैतन्यरूप आत्मा हा सर्वेश्वर, सर्वसाक्षी, सर्वचालक आहे. अनन्यभावाने
त्या देवाशी तदात्म पावणे हेच आमचे कर्तव्य आहे.


आज श्रेष्ठतम मानवी मूल्ये सूळावर आहेत, त्या या (विज्ञान ? ) युगाची बेबंद भौतिकता materialism (या देहविणा मानवाला अस्तित्व नाही ), आणि संस्कृतिविद्वेष, anti-cultural ism, नास्तिकता भरभरून पोसणार्‍या शिस्नोदर
परायणांना गुरुदेवांचे सारस्वत हे झणझणीत अंजन आहे.


- गुरुदेव

It is not enough to be industrious , so are the ants. What are you industrious about ? God ? Then alright. - Gurudev Diary .
- Gurudev Diary

ब्रह्मदेव सांगतात, माझी वाणी कधीच असत्य होत नाही. माझे मन कधीच असत् विषयाकडे आकृष्ट होत नाही.
माझी इंद्रिये चुकून सुध्दा असत् मार्गात प्रवृत्त होत नाहीत. कारण मी उत्कट उत्कंठेने भगवान श्रीहरीला आ
पल्या हृदयी धारण केले आहे .

चक्षुष्मन्तो क्व अन्ध:? डोळे असून आंधळा कोण ?
के स्यु: ये नास्तिका मनुज: ? देव न मनणारा , नास्तिक

God in action as man:

Valmiki Ramayana is great not only because it is an epic, narrative poem, but also because it presents to us God in action as man.

रामो विग्रहवान धर्म |

He is righteousness personified. Rama's words and deeds provide us or yard-stick , for assessing variety of human - personalities, men-women, king-peasants, sages and Rakshas.

Because I have confidence in the power of God and of the spirit, I believe in the future of mankind. - Albert Schweitzer.


देव आहे का ?

If you don't believe in God, you are not a whole man, you are just a number in the book. A lot of smart people claim they don't believe nothing unless they can see it.

Look friend, you eyes can not see electricity in that high-tension wire, up yonder - BUT I DARE YOU TOUCH IT!

No, you can't see that - electricity but you can see the light. - Bilder Johnason.


तो भक्त म्हणतो, " I am mad But my madness has its own logic.
The story of Shri Gurudeo's life is a story of religion, in practice, His life enables us to see God face to face.

No one can read the story of his life without being convinced that God alone is real and that all else is an illusion.

He is a living embodiment of Godliness. His words are the prayer from the soul of life and not those of a learned man. They are revelations of his own experiences.

Sunday, June 14, 2009

सूर्यनारायण




प्रश्नोपनिषद (प्रथम प्रश्न ६-७-८) सांगते,


अथाऽऽदित्य उदयन यात्प्राचीं दिशं प्रविशति तेन | प्राच्यान्प्राणान् रश्मिषु संनिधत्ते| यद्दक्षिणां यत्प्रतीचीं
यदुदीचीं यदधो यदूर्ध्वं यदन्तरादिशो यत्सर्व प्रकाशयति तेन सर्वान प्राणान् रश्मिषु संनिधत्ते ||६||
स एष वै वानरो वि वरूप: प्राणोऽग्निरुदयते| तदेतद्दचाऽभ्युक्तम ||७||

विश्वरूपं हरिणं जातवेदसं परायणं ज्योतिरेकं तपन्तम् सहस्र रश्मि: शतधा वर्तमान: प्राण: प्रजानामुदयत्येष सूर्य: ||८||

(अर्थ: भगवान सूर्य जेंव्हा पूर्व दिशेस प्रवेश करतात तेंव्हा पूर्वेच्या प्राणांना (चैतन्याला) आपल्या किरणात सामावून घेतात.
तसेच ते याप्रमाणे दक्षिण, पश्चिम, उत्तर तसेच उर्ध्व व अधर आणि अंतर अशी सर्वत्र त्यांची किरणे प्रविष्ट होतात. सूर्यनारायण सर्वच प्राणिमात्रांना आपणात अंतर्भूत करतात.)

सर जेम्स जीन्स हां जगत विख्यात शास्त्रज्ञ सांगतो, ' सूर्य मंडलाचा अति विस्तृत भाग तीव्र उष्णता व प्रकाश कीरणात अखंड परिवर्तित होत असतो. त्यातूनच अन्य ग्रहगोल, तसेच धरणीमाता आपल्या स्वत:ला धारण करते.'
"There is no reasonable room for doubt that the Sun weights many millions and millions of tons less than it did."

Dr. Milikan हा अमेरिकन शास्त्रज्ञ ' प्राणशक्ति व घनपदार्थ यांचे परस्पर परिवर्तन सिद्ध करतो. सूर्याच्या शरीराचा एक अंश प्रतिदिन प्राणशक्तीत परिवर्तित होऊन सूर्य किरणातून आपल्या पृथ्वीमंडलावर येत असतो. त्यातून त्या ब्रह्मंडावरील जीवन चालत असते. यात रतिमात्र संशयाला अवसर नाही. हे पूर्ण सत्य आहे.
वैज्ञानिक सांगतात, "भगवान सूर्यनारायण प्रतिदिन जी प्राणशक्ति विश्वाला देतात, ते प्रमाण जर कायम राहिले तर ५ कोटी वर्षात त्याचा देह अर्धाच उरेल."

वैज्ञानिक पुढे सांगतात की, " दहा कोटी वर्षात भगवान सहस्र रश्मि सूर्यनारायणाचे एक दिवस जरी दर्शन घडले नाही तरी जणू प्राणच निघून जातात. सर्व उदास व कंटाळवाणे वाटते. सूर्यनारायणाची जगताची धारण, पोषण करण्याची क्षमताच नाहीशी होईल. याचा अर्थ कृष्णवलय (Black Hole) मध्ये रूपांतरीत होतील."

भगवान सूर्यनारायण यज्ञरूप असून त्यांच्या कृपेमुळेच पार्थिव जीवन बलिष्ठ होते.

विश्वविख्यात ग्रह ज्योतिषज्ञ न्युकोम्ब (New Comb) तसेच सांगतो, तो म्हणतो, " भगवान सूर्यनारायण यज्ञरूप असून त्यांच्यामुळेच पृथ्वीवरचे प्राणी जीवन समृध्द होते."

विश्वविख्यात लेखक गॅब्रियल गरशिया मरक्युअर (Gabriel Garcia Marquez ) लिहितो , प्रतिदिन सकाळ व संध्याकाळी सूर्याची पूजा व ध्यान करणारा एक निरक्षर मनुष्य मी पहिला , गाईंना त्यांच्या कानात बसून दंश करणार्‍या शेकडो गोमाशापासून तो त्यांना बरे करायचा .
त्यांना पीडामूक्त करायचा.गाईंना स्पर्शन करता गाईंपासून पंधरावीस पावलावर दूर उभा राहून एक प्रार्थना म्हणायचा . केवळ एकदाच केलेल्या प्रार्थनेने गोमाशा पासून गाईंना वेदनामुकता करायचा. गाईंच्या कानातील गोमाशा मरून खाली पडायच्या आणि त्या गाईंचे कान स्वच्छ व्हायचे . वास्तविक त्याला त्याला कुठे दूर गाईंकडे जायचीही गरज नसे. त्यांच्या घरी जाऊन जरी कोणी सांगितले तरी तो तिथेच प्रार्थना म्हणून त्या गाईला पीडामूक्त करायचा. मी जर हे प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले नसते तर तुम्हाला
सांगितलेच नसते . त्यांचे शब्द असे,.....
""Had I not seen this with my own eyes I would not have told you" . मी तुम्हाला हे जसे घले तसे शब्द न शब्द सांगतो आहे. " I am telling this word for word as it happened " हीच तर वैज्ञानिकांकडे समस्या आहे. आम्ही सुशिक्षित त्याला जादूचे वास्तव magical realism म्हणतो.

Sunday, June 7, 2009


हिंदू कालगणना : गरुडाची झेप!


आमची काळाची धारणा, रानटी पाश्चात्यांच्या काळ संकल्पनेसारखी संकूचित नाही, क्षूद्र नाही, टिनपाट नाही. चतुर्युगाची कल्पना ही तर एक अतिप्रचंड काल संकल्पनेचा एक लहानसा उपविभाग आहे. आमची काल संकल्पना ऐकाल, तर पाश्चात्यांची जी उफाळणारी संकल्पना (Concept) आहे, तीच त्यांचे डोळे पांढरे करील. पाश्चात्यांची जी उकळणारी soaring fancy आहे, ती सनातन हिंदूंची कालकल्पना ऐकताच झोकांडया खाईल.


आमची कालकल्पना शब्दापलीकडची आहे. अनिवर्चनीय आहे. काळ हे प्रकृतीचे अपत्य आहे. प्रकृति ही त्या कालातीत (timeless) पुरुष अधिष्ठानावर सृष्टी करते. प्रकृति वा पुरुषाला काळाचा प्रतिबंध नाही. हा जो कालातीत (timeless) पुरुष आहे, म्हणजे त्याच्यापासून काळ उत्पन्न होतो. काळ हा प्रकृतीचा विकार आहे.हिंदू सृष्टी अनादि मानतात. सृष्टीचा प्रारंभ सांगता येत नाही. महाप्रलयात सृष्टी नष्ट होते. पण बीजरुपाने ती असतेच आणि सृष्टीनिर्मितीच्या प्रारंभी ती बीजेच फळतात, फुलतात. सृष्टीचा आरंभ केव्हा झाला ते सांगणे असंभव!आमची सनातन हिंदु शास्त्रे कालातीत आहेत. काळ म्हणजे वर्तुळाकार फिरणे. काळाने जे बदल होतात, ती केवल पुनरावृत्ति आहे. म्हणजे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुग आजवर अनेकदा आले. याचा अर्थ त्रेता युगात अनेक राम झालेत. अनेक द्वापर युगात अनेक कृष्ण झालेत, अनेक व्यास झालेत. अशी ही पुनरावृत्ति आहे. ही जी पुनरावृत्ति आहे, ती larger evolution चा अंश आहे. हा जो बदल आहे, तो higher curve चा आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प. ब्रह्मदेवाचा दिवस सुरु झाला की, अव्यक्तापासून सर्व व्यक्त पदार्थ निर्माण होतात व रात्रा सुरु झाली की, हे सर्व पदार्थ अव्यक्तांत लीन होतात. ब्रह्मदेवाचा दिवस जो सध्या सुरु आहे, त्याचे मानवी ४ अब्ज, ३२ कोटी वर्षे झालीत. आतापर्यंत माध्याह्न काळ पूर्ण झाला असून सात मन्वंतरेही झाली नाहीत.


गरुडाची झेप!

हिंदूंची कालगणना -



  • १५ निमेष = १ काष्ठा

  • ३० काष्ठा = १ कला

  • ३० कला = १ मुहूर्त

  • ३० मुहूर्त = १ दिन- रात (दिवस)

  • १५ दिन- रात = १ पक्ष

  • २ पक्ष = १ महिना

  • ६ महिने = १ दक्षिणायण

  • ६ महिने = १ उत्तरायण

  • २ अयन = १ वर्ष

  • १ दक्षिणायण = १ दिव्य रात

  • १ उत्तरायण = १ दिव्य दिन

  • ३० वर्षे = १ दिव्य मास

  • ३६० वर्षे = १ दिव्य वर्ष

  • ३,०३० वर्षे = १ सप्तर्षी वर्ष

  • ६,०६० वर्षे = १ ध्रूव वर्ष

  • ६६,००० वर्षे = १ दिव्य वर्ष सहस्र

  • १७,२८,००० वर्षे = १ सत्ययुग (कृतयुग)

  • १२,६६,००० वर्षे = १ त्रेतायुग

  • ८,६४,००० वर्षे = १ द्वापरयुग

  • ४,३२,००० वर्षे = १ कलियुग

  • ४३,२०,००० वर्षे = १ चतुर्युगी

  • ३०,६७,२०,००० वर्षे = १ मन्वंतर (७१ चतुर्युगी )

  • ४,२६,४०,८०,००० वर्षे = १४ मन्वंतरे

  • २,५६,२०,००० वर्षे = मन्वंतर संध्यांश

  • १,६६,०८,५३,०६४ वर्षे = सृष्टीभुक्त काल (२०२० से)

  • २,३५,६१,४६,६३६ वर्षे = सृष्टीभोग्य काल (२०२० से)

  • ४,३२,००,००,००० वर्षे = १ ब्रह्मदिन सहस्र चतुर्युगी

  • ४,३२,००,००,००० वर्षे = १ ब्रह्मरात्री

जमिनीवर खुरडणारे पाखरू


बायबल सांगते, ख्रि. पूर्व ४००४ या वर्षी सृष्टीला प्रारंभ झाला आणि आता त्याचा विनाशकाळ आहे. ज्यूंचे पंचांग सांगते, जग हे ऑक्टोबर ७, ख्रि. पूर्व ३७६१ रविवार व सोमवार मध्ये दुपारी ११ ते ११:१५ मध्ये निर्माण झाले.


वास्तविक हे जग २००० वर्षे होताच. समाप्त व्हायला हवे होते परंतु हे जग मात्र अधिक जगते आहे.


एक पाश्चात्य वेदसंशोधक वेदांचा काळ दहा सहस्र वर्षांआधीचा असल्याचे सांगतो.मॅक्सम्युलर सांगतो, " वेद तीन सहस्र वर्षांआधीचे आहेत." बायबलच्या सृष्टी उत्पत्तीच्या साच्यात तो वेद बसवतो. त्यानुसार काल सांगतो. कुणी सांगतो, पाच सहस्र वर्षांआधी इतिहासपूर्व काळ होता, तेव्हा मनुष्य रानटी होता.


कसे क्षुद्र चिंतन आहे यांचे! हे रानटी पाश्चात्य!! यांच्या कल्पनेची ही भरारी!!!

Sunday, February 15, 2009

Aspects of our Religion

We have no evidence as to when our religion "began". Obviously, it did not "begin" at a particular time. It must be said to be beginningless. It has been existing always. It is SANATAN. The nearest sanskrit word for religion is DHARMA, though Dharma signifies much more than religion. Our religion, cannot be named after a founder; for there was no founder for it. So, if at all it is necessary to give a name to our religion, it can only be called SANATAN DHARMA or the eternal religion.